शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

भारताचा जवान शहीद, मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 03:29 IST

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू असून, राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचा एक जवान

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू असून, राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचा एक जवान शहीद झाला. नायक मुद्दसर अहमद शहीद झाले असून, दुसरीकडे बालाकोट सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात एक नऊ वर्षांची मुलगी ठार झाली. नायक मुद्दसर अहमद हे काश्मीरचे असून, त्यांच्यामागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. अतिशय प्रामाणिक जवान आम्ही गमावला आहे, असे लष्कराने म्हटले. पाकच्या गोळीबारात मरण पावलेली सजदा हौसर ही अवघ्या नऊ वर्षांची मुलगी बारोटी गावची आहे. याशिवाय तेथील दोन रहिवासी जखमी झाले आहेत. (वृत्तसंस्था)आमचे सैनिक बुडाले; पाकचा दावापाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) नियंत्रण रेषेजवळ रेकी करत असलेल्या एका वाहनावर भारतीय सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. त्यामुळे ते वाहन नदीत बुडाले. त्यामध्ये आमचे ४ सैनिक होते असे पाकिस्तानने म्हटले आहे. पीओकेच्या मुजफ्फराबादपासून ७३ किलोमीटर दूर नीलम नदीजवळ असलेल्या एका वाहनावर भारतीय जवानांनी गोळीबार केला . त्यामुळे चार सैनिक नदीत बुडाले असं पाकिस्तानी सेनेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून, तिघांचा शोध सुरू आहे. डीजीएमओमधील चर्चेनंतरही पाकने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन दोन्ही देशांमध्ये झालेल्या डीजीएमओ स्तराच्या चर्चेमध्ये पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या गोळीबारात आपले चार सैनिक ठार झाल्याचा दावा केला. त्याचवेळी भारताने पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे सांगितले. पाकच्या कुठल्याही हल्ल्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल, असे भारताने बजावले आहे. महत्त्वाचे पाकच्या विनंतीवरुन दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाल्यानंतरही पाकिस्तानने अशा प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गेल्या दोन दिवासांपासून गोळीबार सुरू आहे. प्रत्युत्तरात भारतीय सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारामध्ये पाकिस्तानच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे.