शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

भारतीयांचे हात पिवळे करण्याचे वय वाढले!

By admin | Updated: April 29, 2015 23:41 IST

भारतीय तरुण-तरुणी दशकभरापूर्वीच्या तुलनेत आता काहीसे अधिक वय झाल्यानंतर लग्न करण्यास पसंती देत आहेत.

नवी दिल्ली : भारतीय तरुण-तरुणी दशकभरापूर्वीच्या तुलनेत आता काहीसे अधिक वय झाल्यानंतर लग्न करण्यास पसंती देत आहेत. यामुळे प्रजनन दरातही लक्षणीय घट नोंदली गेली आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. २०११ च्या जनगणना अभ्यासात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.२००१ आणि २०११ च्या जगणनेचा अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या काळात महिलांच्या लग्नाचे किमान वय १८.३ वरून वाढून १९.३ वर्षे झाले आहे. तसेच पुरुषांचे वयही २२.६ वरून २३.३ वर्षे झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कधीकाळी बालविवाहाला आळा घालण्यासाठी सरकारला लग्नाकरिता किमान वयाचा कायदा आणावा लागला होता. अहवालात म्हटले आहे की, पुरुष आणि महिला, दोन्हींमध्ये घटस्फोट आणि वेगळे झालेल्या दाम्पत्यांच्या प्रमाणात अंशत: वाढ झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर एकूण महिलांच्या तुलनेत विवाहित महिलांचे प्रमाण २०११ च्या जनगणनेत ४९.९ टक्के एवढे नोंदले गेले. २००१ मध्ये हे प्रमाण ४७.७ टक्के होते, असे वैैवाहिक स्थितीसंदर्भातील आकडेवारीत म्हटले आहे. पुरुषांबाबत हे प्रमाण २०११ मध्ये ४६.० टक्के, तर २००१ मध्ये ४३.६ टक्के होते. भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त यांच्याद्वारे हा अभ्यास अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालानुसार, प्रजनन दरातही घट नोंदली गेली आहे. २०११ मध्ये मुलांचा लिंगनुपात २००१ च्या तुलनेत सर्वच वयोगटात कमी झाल्याचे दिसून येते. तथापि, युवकांच्या वयोगटात विशेषत: २० वयाखालील मुलांच्या लिंगदरात मोठी घट झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)४या काळात सर्वच वयोगटांतील भारतीयांच्या आयुष्यमानात वाढ झाली आहे. १५ ते ४९ या वयोगटातील महिलांचा राष्ट्रीय पातळीवरील प्रजनन दर २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये घटला आहे. राष्ट्रीय पातळीवर एकूण प्रजनन दर २००१ ते २०११ या काळात २.५ टक्क्यांवरून घटून २.२ झाला आहे. ४विधवा महिलांचे प्रमाण २००१ मध्ये ६.४ टक्क्यांनी वाढून २०११ मध्ये ७.४ टक्के झाले. विधुरांचे प्रमाण १.८ टक्क्यांवरून २.० टक्के झाले.