शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांचे हात पिवळे करण्याचे वय वाढले!

By admin | Updated: April 29, 2015 23:41 IST

भारतीय तरुण-तरुणी दशकभरापूर्वीच्या तुलनेत आता काहीसे अधिक वय झाल्यानंतर लग्न करण्यास पसंती देत आहेत.

नवी दिल्ली : भारतीय तरुण-तरुणी दशकभरापूर्वीच्या तुलनेत आता काहीसे अधिक वय झाल्यानंतर लग्न करण्यास पसंती देत आहेत. यामुळे प्रजनन दरातही लक्षणीय घट नोंदली गेली आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. २०११ च्या जनगणना अभ्यासात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.२००१ आणि २०११ च्या जगणनेचा अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या काळात महिलांच्या लग्नाचे किमान वय १८.३ वरून वाढून १९.३ वर्षे झाले आहे. तसेच पुरुषांचे वयही २२.६ वरून २३.३ वर्षे झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कधीकाळी बालविवाहाला आळा घालण्यासाठी सरकारला लग्नाकरिता किमान वयाचा कायदा आणावा लागला होता. अहवालात म्हटले आहे की, पुरुष आणि महिला, दोन्हींमध्ये घटस्फोट आणि वेगळे झालेल्या दाम्पत्यांच्या प्रमाणात अंशत: वाढ झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर एकूण महिलांच्या तुलनेत विवाहित महिलांचे प्रमाण २०११ च्या जनगणनेत ४९.९ टक्के एवढे नोंदले गेले. २००१ मध्ये हे प्रमाण ४७.७ टक्के होते, असे वैैवाहिक स्थितीसंदर्भातील आकडेवारीत म्हटले आहे. पुरुषांबाबत हे प्रमाण २०११ मध्ये ४६.० टक्के, तर २००१ मध्ये ४३.६ टक्के होते. भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त यांच्याद्वारे हा अभ्यास अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालानुसार, प्रजनन दरातही घट नोंदली गेली आहे. २०११ मध्ये मुलांचा लिंगनुपात २००१ च्या तुलनेत सर्वच वयोगटात कमी झाल्याचे दिसून येते. तथापि, युवकांच्या वयोगटात विशेषत: २० वयाखालील मुलांच्या लिंगदरात मोठी घट झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)४या काळात सर्वच वयोगटांतील भारतीयांच्या आयुष्यमानात वाढ झाली आहे. १५ ते ४९ या वयोगटातील महिलांचा राष्ट्रीय पातळीवरील प्रजनन दर २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये घटला आहे. राष्ट्रीय पातळीवर एकूण प्रजनन दर २००१ ते २०११ या काळात २.५ टक्क्यांवरून घटून २.२ झाला आहे. ४विधवा महिलांचे प्रमाण २००१ मध्ये ६.४ टक्क्यांनी वाढून २०११ मध्ये ७.४ टक्के झाले. विधुरांचे प्रमाण १.८ टक्क्यांवरून २.० टक्के झाले.