शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

भारतीयांचे हात पिवळे करण्याचे वय वाढले!

By admin | Updated: April 29, 2015 23:41 IST

भारतीय तरुण-तरुणी दशकभरापूर्वीच्या तुलनेत आता काहीसे अधिक वय झाल्यानंतर लग्न करण्यास पसंती देत आहेत.

नवी दिल्ली : भारतीय तरुण-तरुणी दशकभरापूर्वीच्या तुलनेत आता काहीसे अधिक वय झाल्यानंतर लग्न करण्यास पसंती देत आहेत. यामुळे प्रजनन दरातही लक्षणीय घट नोंदली गेली आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. २०११ च्या जनगणना अभ्यासात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.२००१ आणि २०११ च्या जगणनेचा अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या काळात महिलांच्या लग्नाचे किमान वय १८.३ वरून वाढून १९.३ वर्षे झाले आहे. तसेच पुरुषांचे वयही २२.६ वरून २३.३ वर्षे झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कधीकाळी बालविवाहाला आळा घालण्यासाठी सरकारला लग्नाकरिता किमान वयाचा कायदा आणावा लागला होता. अहवालात म्हटले आहे की, पुरुष आणि महिला, दोन्हींमध्ये घटस्फोट आणि वेगळे झालेल्या दाम्पत्यांच्या प्रमाणात अंशत: वाढ झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर एकूण महिलांच्या तुलनेत विवाहित महिलांचे प्रमाण २०११ च्या जनगणनेत ४९.९ टक्के एवढे नोंदले गेले. २००१ मध्ये हे प्रमाण ४७.७ टक्के होते, असे वैैवाहिक स्थितीसंदर्भातील आकडेवारीत म्हटले आहे. पुरुषांबाबत हे प्रमाण २०११ मध्ये ४६.० टक्के, तर २००१ मध्ये ४३.६ टक्के होते. भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त यांच्याद्वारे हा अभ्यास अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालानुसार, प्रजनन दरातही घट नोंदली गेली आहे. २०११ मध्ये मुलांचा लिंगनुपात २००१ च्या तुलनेत सर्वच वयोगटात कमी झाल्याचे दिसून येते. तथापि, युवकांच्या वयोगटात विशेषत: २० वयाखालील मुलांच्या लिंगदरात मोठी घट झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)४या काळात सर्वच वयोगटांतील भारतीयांच्या आयुष्यमानात वाढ झाली आहे. १५ ते ४९ या वयोगटातील महिलांचा राष्ट्रीय पातळीवरील प्रजनन दर २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये घटला आहे. राष्ट्रीय पातळीवर एकूण प्रजनन दर २००१ ते २०११ या काळात २.५ टक्क्यांवरून घटून २.२ झाला आहे. ४विधवा महिलांचे प्रमाण २००१ मध्ये ६.४ टक्क्यांनी वाढून २०११ मध्ये ७.४ टक्के झाले. विधुरांचे प्रमाण १.८ टक्क्यांवरून २.० टक्के झाले.