शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

भारताचा श्रीलंकेवर २७८ धावांनी शानदार विजय

By admin | Updated: August 24, 2015 12:59 IST

कोलंबो येथील दुस-या कसोटीत भारताने श्रीलंकेवर २७८ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २४ - श्रीलंकेविरुदच्या दुस-या कसोटीत भारताने २७८ धावांनी विजय मिळवत ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१अशी बरोबरी साधली आहे. श्रीलंकेचे सर्व गडी १३४ धावांत बाद झाले.  अश्विनने ४२ धावांमध्ये सर्वाधिक ५ बळी मिळवत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच विजय आहे.  के. एल. राहुलला 'मॅन ऑफ दि मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले. 
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू करताना श्रीलंकेची धावसंख्या २ बाद ७२ अशी होती, मात्र श्रीलंकेचे उर्वरित ८ गडी अवघ्या ६२ धावांत तंबूत परतले आणि भारताने सामना खिशात टाकला. श्रीलंकेचा हेराथ ४ धावांवर नाबाद राहिला.
कर्णधार अँजलो मॅथ्यूज (२३), धोकादायक फलंदाज दिनेश चंडीमल (१५) , थिरिमने (११) ,जेहान मुबारक (०), प्रसाद (०) , करूणारत्ने (४६), कौशल (५) व चमिरा (४)  हे फलंदाज पटापट बाद झाल्याने श्रीलंकेची डाव कोसळला. करूणारत्ने ४६ धावा करत थोडी झुंज द्यायचा प्रयत्न केला खरा मात्र त्याला इतर फलंदाजांची पुरेशी साथ मिळाल्याने त्यांचा डाव १३४ धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे अश्विनने ५, मिश्राने ३ तर शर्मा व यादवने प्रत्येकी १ बळी टिपला.