शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

पाककडून भारताची हेरगिरी

By admin | Updated: July 11, 2015 23:56 IST

वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या भारताविरुद्ध कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानने आता भारताची हेरगिरी करण्यासाठी राजस्थान सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

जोधपूर : वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानच्या भारताविरुद्ध कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानने आता भारताची हेरगिरी करण्यासाठी राजस्थान सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. भारतीय क्षेत्रात हेरगिरीची कुठलीही संधी या देशाचे सैनिक सोडत नाहीत. यासाठी यूएव्ही (मानवरहित विमान) किंवा कॅमेऱ्याचा वापर केला जातो.सीमा सुरक्षा दलाचे उपमहानिरीक्षक (राजस्थान फ्रंटियर) रवी गांधी यांनी शनिवारी ही धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले की, भारतीय क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी पाकतर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. आक्षेप नोंदविण्यात आल्यानंतर ही लुडबूड थांबली असली तरी काही भागांत अजूनही चिंताजनक परिस्थिती आहे. पाकिस्तानी रेंजर्स त्यांच्या गुप्तहेरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असावेत. अथवा अमली पदार्थ किंवा शस्त्रास्त्रांची तस्करी करणारे रात्रीच्या अंधारात भारतीय हद्दीत घुसले असतील, असा अंदाज एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. भारत-म्यानमार सीमेवर प्रभावी व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती पुढील काही हप्त्यांत आपला अहवाल सादर करणार असून, समितीच्या शिफारशींनुसार पाऊल उचलण्यात येईल, असे राजनाथसिंह म्हणाले.चिनी तंत्रज्ञानाचा वापर...सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी गेल्या एप्रिल महिन्यात सीमेलगत पाकिस्तानच्या क्षेत्रात १५० ते ४०० मीटर उंचावर एक तीव्र प्रकाशझोत बघितला होता. ते नेमके काय होते आम्हाला माहिती नाही; परंतु ते ड्रोन अथवा यूएव्ही असावे असे मानून आम्ही पाकिस्तानी रेंजर्ससमक्ष हा मुद्दा उपस्थित करून आक्षेप नोंदविला. त्यानंतर काही काळ हा प्रकार थांबला होता; परंतु पुन्हा त्यांनी बाडमेर, जैसलमेर, बिकानेर आणि गंगानगरमध्ये अनेक ठिकाणी सीमेजवळ कॅमेरे बसविणे सुरू केले, असे गांधी यांनी सांगितले. आक्षेपानंतर राजस्थान फ्रंटियरच्या सीमेवरून कॅमेरे हटविण्यात आले असले तरी अन्य फ्रंटियरच्या सीमेवर काही कॅमेरे अजूनही लागलेले आहेत. कॅमेरे बसविण्यासाठी १५ फूट उंच पोल उभारण्यात आले असून यासाठी चिनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. काही कॅमेरे झुडपांमध्ये आहेत.