शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

भारतावर हल्ल्याचा सईदचा पुन्हा कट?

By admin | Updated: December 29, 2016 00:07 IST

लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या आणि मुंबईवर २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आता पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे.

इस्लामाबाद : लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या आणि मुंबईवर २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आता पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. यासाठी त्याने इस्लामिक स्टेट (इसिस)ची मदत मागितली असल्याचे वृत्त आहे. इस्लामिक स्टेटला आपल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी हाफिज सईदची लष्कर-ए-तय्यबा तसेच फलाह-ए-इन्सानियत या दोन्ही संघटना सीरियामध्ये सक्रिय झाल्या आहेत.गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सईदची संघटना फलाह-ए-इन्सानियत तेथील लोकांना मदत पुरवण्याचे काम करत आहे. पण मदतीच्या नावाखाली हाफिज सईद प्रत्यक्षात सीरियीमधील इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांशी संपर्क साधत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. फलाह-ए-इन्सानियत संघटनेच्या नावाखाली हाफिज सईद लष्कर-ए-तयब्बाचे दहशतवादी नेटवर्क चालवतो, हे उघड झाले आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज इस्लामिक स्टेटच्या मदतीने भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. याशिवाय हाफिज सईदने पाकिस्तान सरकारला भारताशी मैत्री न करण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय जवान काश्मीरमधील लोकांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप हाफिज सतत करीत आला आहे. या आरोपांद्वारे तो पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची सहानुभूती व आर्थिक मदत मिळवत असतो. काश्मीरमधील लोकांना मदत केली पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे, अशी मागणी त्याने पाकिस्तान सरकारकडे केली आहे. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनवर बंदी घालण्याची तयारी सरकारने सुरू केली होती. तसेच त्याच्याच जमात उल दवा या संघटनेवरही सरकारने बंदी घालण्याचे ठरवले होते. पण अद्याप या सर्व संघटना पाकिस्तानात, विशेषत: पाकव्याप्त काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनतर्फे अनेक ठिकाणी मोफत दवाखानेही चालविले जातात. (वृत्तसंस्था)फलाह-ए-इन्सानियतविषयीफलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन ही संस्था गरीब लोकांना अन्नधान्य तसेच अन्य मदत करण्यासाठी हाफिज सईदने स्थापन केली असली तरी त्या मार्गाने लष्कर-ए-तयब्बासाठी अतिरेकी तयार करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनने रक्तदान शिबिरे, वैद्यकीय तपासणी शिबिरे अशी कामे करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांची सहानुभूती मिळवली आहे. मात्र या संस्थेच्या कामांचा अंतिम उद्देश अतिरेकी कायवाया आहे, हे पाकिस्तान सरकारलाही माहीत आहे.