शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

भारतावर हल्ल्याचा सईदचा पुन्हा कट?

By admin | Updated: December 29, 2016 00:07 IST

लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या आणि मुंबईवर २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आता पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे.

इस्लामाबाद : लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या आणि मुंबईवर २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद आता पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. यासाठी त्याने इस्लामिक स्टेट (इसिस)ची मदत मागितली असल्याचे वृत्त आहे. इस्लामिक स्टेटला आपल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी हाफिज सईदची लष्कर-ए-तय्यबा तसेच फलाह-ए-इन्सानियत या दोन्ही संघटना सीरियामध्ये सक्रिय झाल्या आहेत.गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सईदची संघटना फलाह-ए-इन्सानियत तेथील लोकांना मदत पुरवण्याचे काम करत आहे. पण मदतीच्या नावाखाली हाफिज सईद प्रत्यक्षात सीरियीमधील इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांशी संपर्क साधत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. फलाह-ए-इन्सानियत संघटनेच्या नावाखाली हाफिज सईद लष्कर-ए-तयब्बाचे दहशतवादी नेटवर्क चालवतो, हे उघड झाले आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हाफिज इस्लामिक स्टेटच्या मदतीने भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. याशिवाय हाफिज सईदने पाकिस्तान सरकारला भारताशी मैत्री न करण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय जवान काश्मीरमधील लोकांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप हाफिज सतत करीत आला आहे. या आरोपांद्वारे तो पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची सहानुभूती व आर्थिक मदत मिळवत असतो. काश्मीरमधील लोकांना मदत केली पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे, अशी मागणी त्याने पाकिस्तान सरकारकडे केली आहे. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनवर बंदी घालण्याची तयारी सरकारने सुरू केली होती. तसेच त्याच्याच जमात उल दवा या संघटनेवरही सरकारने बंदी घालण्याचे ठरवले होते. पण अद्याप या सर्व संघटना पाकिस्तानात, विशेषत: पाकव्याप्त काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनतर्फे अनेक ठिकाणी मोफत दवाखानेही चालविले जातात. (वृत्तसंस्था)फलाह-ए-इन्सानियतविषयीफलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन ही संस्था गरीब लोकांना अन्नधान्य तसेच अन्य मदत करण्यासाठी हाफिज सईदने स्थापन केली असली तरी त्या मार्गाने लष्कर-ए-तयब्बासाठी अतिरेकी तयार करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनने रक्तदान शिबिरे, वैद्यकीय तपासणी शिबिरे अशी कामे करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांची सहानुभूती मिळवली आहे. मात्र या संस्थेच्या कामांचा अंतिम उद्देश अतिरेकी कायवाया आहे, हे पाकिस्तान सरकारलाही माहीत आहे.