शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
4
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
5
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
6
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
7
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
8
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!
9
FD मध्ये गुंतवणूक करायचीय? हे आहेत 10 बेस्ट बँक ऑप्शन्स, येथे मिळतोय जवळपास 9% परतावा; जाणून घ्या सविस्तर
10
Diwali 2025: रांगोळीत दडलंय लक्ष्मी कृपेचं गूढ, एकदा समजून घ्याल तर स्टिकर वापरणार नाही!
11
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
12
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
13
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
14
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
15
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
16
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
17
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
18
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
19
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
20
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई

भारताचे चोख प्रत्युत्तर; पाच पाकी रेंजर्स ठार

By admin | Updated: January 3, 2015 03:04 IST

पाकिस्तानने नववर्षात कुरापती सुरूच ठेवल्या असून गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या आदेशानुसार सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी(बीएसएफ) चोख प्रत्युत्तर देत पाच पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातले.

जम्मू : पाकिस्तानने नववर्षात कुरापती सुरूच ठेवल्या असून गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या आदेशानुसार सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी(बीएसएफ) चोख प्रत्युत्तर देत पाच पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातले.जम्मू-काश्मीरच्या सांबा आणि कठुआ जिल्'ात बीएसएफच्या आठ चौक्यांना लक्ष्य बनवत पाकिस्तानने शुक्रवारी जोरदार गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केल्यानंतर तणाव निर्माण झाला. गुरूवारपासून चकमकी झडत असून भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात पाच पाकिस्तानी रेंजर्स ठार झाल्याच्या वृत्ताला रात्री उशिरा दुजोरा देण्यात आला. गेल्या चार दिवसांत पाकने लागोपाठ चौथ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गृहमंत्री राजनाथसिंग यांनी बीएसएफच्या जवानांना चोख प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला आहे.

 

सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सचा गोळीबार

जम्मू : गेल्या चार दिवसांपासून पाकिस्तानच्या बाजूने सीमेवर कुरापती चालूच असून शुक्रवारी रात्री पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू विभागातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या सांबा, कथुआ भागातील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या आठ चौक्यांवर उखळी तोफांंच्या माऱ्यासह गोळीबार केला. 

पाकिस्तानच्या बाजूने गेल्या चार दिवसांपासून भारतीय हद्दीत गोळीबार होत असल्याने गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सीमा सुरक्षा दलाला योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी रात्री ९.३५ सांबा आणि कथुआतील रिगल, चल्लीयारी, सुचेतगढसह सीमा सुरक्षा दलाच्या ८ चौक्यांवर गोळीबार केला. सीमेपलीकडील रझाब शीद, असिफ शीद, चक भुरा, न्यू पाक आणि धनधर चौकीवरून पाकिस्तानी रेंजर्सनी उखळी तोफांच्या माऱ्यासह गोळीबार केला.