शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

मद्यसम्राटाची भारतवापसी?

By admin | Updated: April 19, 2017 03:29 IST

आकाशपाताळ एक करून मद्यसम्राट विजय माल्याला भारतात आणण्यासाठी मोदी सरकार करीत असलेले प्रयत्न यशस्वी होण्याची चिन्हे दिसत असून

हरीश गुप्ता, नवी दिल्लीआकाशपाताळ एक करून मद्यसम्राट विजय माल्याला भारतात आणण्यासाठी मोदी सरकार करीत असलेले प्रयत्न यशस्वी होण्याची चिन्हे दिसत असून, आता न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माल्या भारताच्या हाती येईल. ब्रिटनच्या स्कॉटलँड पोलिसांनी माल्याला अटक करताना, त्याच्या प्रत्यार्पणाची कार्यवाहीही सुरू केली आहे. अटकेनंतर वेस्टमिन्स्टर कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली असली, तरी भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी लगेचच प्रयत्न सुरू केले आहेत.माल्याचे प्रकरण मोदी सरकारची कसोटी पाहाणारे आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांची संसदेच्या स्वागतकक्षात भेट घेतल्यानंतर माल्याने २ मार्च २०१६ च्या रात्री कोणालाही थांगपत्ता न लागू देता भारतातून पळ काढून लंडन गाठले. थकीत कर्जापैकी ४ हजार कोटी रुपये परत करण्याची तयारी दाखवित, त्याने वाद मिटविण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना राजी करावे, यासाठी सरकारला मदत करण्याचे साकडेही घातले. त्यावर जेटली यांनी तुम्हीच स्वत: बँकांशी बोलणी करून वाद तात्काळ मिटवा, असे माल्याला सांगितले होते. तो भारत सोडून गेल्याचे कळताच मोदी सरकारची पंचाईत झाली होती. त्यानंतर सरकारने ब्रिटिश उच्चायुक्तांना पाचारण करून माल्याच्या प्रर्त्यापणासाठी ब्रिटनला मदत करण्याची विनंती केली.फेमा प्रकरण प्रलंबित असताना आयपीएलचा माजी आयुक्त ललित मोदी हाही ब्रिटनला पळून गेला. अशात माल्याने पळ काढल्याने मोदी सरकारच्या प्रतिमेला चांगलाच हादरा बसला. ललित मोदींच्या कॅन्सरग्रस्त पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी ब्रिटनला नेण्यासाठी संबंधित कागदपत्रे मिळवून देण्यासाठी सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचे स्पष्ट झाल्याने मोदी सरकार आणखीच कोंडीत सापडले होते. त्यापाठोपाठ मोईन कुरेशीचे प्रकरण उजेडात आले; परंतु माल्यामुळे मोदी सरकार भलतेच अडचणीत सापडले.अखेर जेटली यांनी लंडनला भेट देऊ न आर्थिक घोटाळा करणाऱ्यासाठी लंडन सुरक्षित ठिकाण होऊ शकत नाही, असे स्पष्ट करून ब्रिटिश सरकारला माल्याच्या प्रकरणाचे गांभीर्य पटवून दिले. मोदी यांनीही राजनैतिक मार्गाने माल्या प्रकरण भारताच्या दृष्टीने किती गंभीर आणि महत्त्वाचे असल्याचे कळविले होते. मोईन कुरेशीला भारतात आणून त्याच्याविरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात मोदी सरकारला यश आले. तसेच शस्त्रास्त्र विक्रेता संजय भंडारीलाही भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वत:ला ‘द किंग आॅफ गुड टाइम्स’ म्हणणारा विजय माल्याला अखेर दणका बसलाच. त्याची किंगफिशर एअरलाइन्स २०१२ मध्ये वाढत्या कर्जामुळे बंद पडली. कर्जप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून, माल्याला या प्रकरणातही चौकशीला सामोरे जावे लागेल.