शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

परदेशात प्रवास करणा-या भारतीयांना 1 जुलैपासून नो डिपार्चर कार्ड !

By admin | Updated: June 19, 2017 18:06 IST

भारतातून परदेशात विमानानं प्रवास करणा-या प्रवाशांना 1 जुलैपासून डिपार्चर कार्ड भरणे आवश्यक नाही

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - भारतातून परदेशात विमानानं प्रवास करणा-या प्रवाशांना 1 जुलैपासून डिपार्चर कार्ड भरणे आवश्यक नाही. मात्र भारतातून परदेशात रेल्वे, समुद्रमार्गे प्रवास करणा-यांना एम्बार्केशन कार्ड भरावं लागणार आहे. सर्व भारतीयांना आता आंतरराष्ट्रीय विमानतळांवर डिपार्चर कार्ड भरणं सक्तीचं नाही. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जुलै 2017पासून होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे. भारतातून परदेशात प्रवास करणा-यांच्या कटकटी काहीशा कमी करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत परदेशात जाणा-या भारतीयांना डिपार्चर कार्ड भरावं लागतं. त्यात नाव, जन्मतारीख, पासपोर्ट नंबर आणि भारतातील पत्ता, विमानाचा नंबर आणि बोर्डिंगची तारीख ही सर्व माहिती भरावी लागते, या सर्व प्रक्रियेत भरपूर वेळ जातो. तसेच ही सर्व माहिती अन्य स्रोतातून यंत्रणेकडे आधीच उपलब्ध असते. त्यामुळेच आम्ही डिपार्चर कार्ड न भरण्याचा निर्णय घेतला आहे, असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना पुरेसा वेळ मिळणार आहे. तसेच मोठ्या संख्येनं प्रवाशांकडून हा फॉर्म भरून घेणा-या अधिका-यांनाही काहीसा दिलासा मिळणार आहे. भारतीय प्रवासी आगमनच्या वेळी सर्व माहिती अधिका-यांना देत असतात. आता विमानतळ अधिकारीच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देणार आहेत. भारतातल्या नवी दिल्ली, मुंबई, कोचीन, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद तसेच इतर देशांचे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहेत. तत्पूर्वी पटना, चेन्नई, गुवाहाटी, तिरुअनंतपुरम, जयपूर आणि लखनऊ या विमानतळांवरील प्रवाशांच्या बॅगेला टॅग न लावण्याचा निर्णय सीआयएसएफने घेतला आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर बॅगांना टॅग लावण्यात येत नाही. 30 एप्रिलपासून या सहा विमानतळांवर आठवडाभर प्रायोगिक तत्त्वावर बॅगांना टॅग लावण्यात आला नव्हता. याचा परिणाम पाहून पुढील निर्णय आम्ही घेऊ, असे सीआयएसएफचे महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले. तसेच जर सर्व सुरक्षिततेच्या दृष्टीने समाधानकारक वाटल्यास सहाही विमानतळांवर लवकरच बॅगेला टॅग लावून स्टॅम्पिंग करण्यात येणार नाही, असेही ओ. पी. सिंह म्हणाले होते. याआधी 1 एप्रिलपासून देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद विमानतळावरील प्रवाशांच्या बॅगेला टॅग न लावण्याचा निर्णय सीआयएसएफने घेतला होता. आता पटना, चेन्नई, गुवाहटी, तिरुअनंतपुरम, जयपूर आणि लखनऊ या विमानतळांवर घेतला होता. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 1992 पासून आपल्या देशात विमानतळांवर बॅगांना स्टॅम्पिंग टॅग लावण्याची पद्धत सुरू झाली. सीआयएसएफचे जवान बॅगेचा टॅग व स्टॅम्प तपासून प्रवाशांना विमानात बसण्यास पाठवतात. ही पद्धत वेळखाऊ तसेच प्रवाशांना डोकेदुखी ठरत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे.