शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात प्रवास करणा-या भारतीयांना 1 जुलैपासून नो डिपार्चर कार्ड !

By admin | Updated: June 19, 2017 18:06 IST

भारतातून परदेशात विमानानं प्रवास करणा-या प्रवाशांना 1 जुलैपासून डिपार्चर कार्ड भरणे आवश्यक नाही

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - भारतातून परदेशात विमानानं प्रवास करणा-या प्रवाशांना 1 जुलैपासून डिपार्चर कार्ड भरणे आवश्यक नाही. मात्र भारतातून परदेशात रेल्वे, समुद्रमार्गे प्रवास करणा-यांना एम्बार्केशन कार्ड भरावं लागणार आहे. सर्व भारतीयांना आता आंतरराष्ट्रीय विमानतळांवर डिपार्चर कार्ड भरणं सक्तीचं नाही. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जुलै 2017पासून होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे. भारतातून परदेशात प्रवास करणा-यांच्या कटकटी काहीशा कमी करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत परदेशात जाणा-या भारतीयांना डिपार्चर कार्ड भरावं लागतं. त्यात नाव, जन्मतारीख, पासपोर्ट नंबर आणि भारतातील पत्ता, विमानाचा नंबर आणि बोर्डिंगची तारीख ही सर्व माहिती भरावी लागते, या सर्व प्रक्रियेत भरपूर वेळ जातो. तसेच ही सर्व माहिती अन्य स्रोतातून यंत्रणेकडे आधीच उपलब्ध असते. त्यामुळेच आम्ही डिपार्चर कार्ड न भरण्याचा निर्णय घेतला आहे, असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना पुरेसा वेळ मिळणार आहे. तसेच मोठ्या संख्येनं प्रवाशांकडून हा फॉर्म भरून घेणा-या अधिका-यांनाही काहीसा दिलासा मिळणार आहे. भारतीय प्रवासी आगमनच्या वेळी सर्व माहिती अधिका-यांना देत असतात. आता विमानतळ अधिकारीच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देणार आहेत. भारतातल्या नवी दिल्ली, मुंबई, कोचीन, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद तसेच इतर देशांचे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहेत. तत्पूर्वी पटना, चेन्नई, गुवाहाटी, तिरुअनंतपुरम, जयपूर आणि लखनऊ या विमानतळांवरील प्रवाशांच्या बॅगेला टॅग न लावण्याचा निर्णय सीआयएसएफने घेतला आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर बॅगांना टॅग लावण्यात येत नाही. 30 एप्रिलपासून या सहा विमानतळांवर आठवडाभर प्रायोगिक तत्त्वावर बॅगांना टॅग लावण्यात आला नव्हता. याचा परिणाम पाहून पुढील निर्णय आम्ही घेऊ, असे सीआयएसएफचे महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले. तसेच जर सर्व सुरक्षिततेच्या दृष्टीने समाधानकारक वाटल्यास सहाही विमानतळांवर लवकरच बॅगेला टॅग लावून स्टॅम्पिंग करण्यात येणार नाही, असेही ओ. पी. सिंह म्हणाले होते. याआधी 1 एप्रिलपासून देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद विमानतळावरील प्रवाशांच्या बॅगेला टॅग न लावण्याचा निर्णय सीआयएसएफने घेतला होता. आता पटना, चेन्नई, गुवाहटी, तिरुअनंतपुरम, जयपूर आणि लखनऊ या विमानतळांवर घेतला होता. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 1992 पासून आपल्या देशात विमानतळांवर बॅगांना स्टॅम्पिंग टॅग लावण्याची पद्धत सुरू झाली. सीआयएसएफचे जवान बॅगेचा टॅग व स्टॅम्प तपासून प्रवाशांना विमानात बसण्यास पाठवतात. ही पद्धत वेळखाऊ तसेच प्रवाशांना डोकेदुखी ठरत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे.