शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

...तेव्हा भारतीय अधिकारी पाकच्या पाहुणचारात मग्न!

By admin | Updated: June 12, 2016 01:59 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गृहसचिव स्तरावरील चर्चा संपताच २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता, पण हल्ला झाला, तेव्हा पाकच्या आग्रहाखातर भारतीय गृहसचिव

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात गृहसचिव स्तरावरील चर्चा संपताच २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता, पण हल्ला झाला, तेव्हा पाकच्या आग्रहाखातर भारतीय गृहसचिव इस्लामाबादेत एक दिवस थांबले होते, असे आता उघड झाले आहे.दोन्ही देशांची २६ नोव्हेंबर रोजी चर्चा समाप्त झाली होती. त्याच मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. हल्ल्याच्या वेळी तत्कालीन गृहसचिव मधुकर गुप्ता आणि अन्य काही अधिकारी पाकिस्तानातील रमणीय हिल स्टेशन मरी येथे थांबले होते. साडेसात वर्षांनंतर या प्रकरणाची माहिती उघड झाली आहे. मुंबईवर हल्ला झाल्याचे समजल्यानंतरही गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी पाकिस्तानात थांबण्याची योजना का आखली? या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. त्या वेळी गुप्ता यांच्यासोबत अतिरिक्त सचिव (बॉर्डर मॅनेजमेंट), अन्वर अहसान अहमद, संयुक्त सचिव (अंतर्गत सुरक्षा) दीप्तिविलास व अन्य अधिकारी होते.पाकचे गृहमंत्री त्या वेळी दौऱ्यावर होते. त्याची भारतीय अधिकाऱ्यांनी भेट घ्यावी, असा पाक अधिकाऱ्यांचा आग्रह होता. त्या वेळी गृहमंत्रालयात असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘चर्चा समाप्त झाल्यानंतरही भारतीय अधिकारी तेथे एक दिवस जास्त का राहिले? यावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात.’ (वृत्तसंस्था)चर्चा संपल्यानंतर मुक्काम का?मुंबईवर हल्ला झाला असतानाही २७ नोव्हेंबरपर्यंत अधिकाऱ्याचा दौरा चालूच होता. मुळात चर्चा संपल्यानंतर अधिकाऱ्यांनी तिथे थांबण्याचे कारण नव्हते. मुंबईवर हल्ला झाल्याचे कळल्यानंतर त्यांचे थांबणे तर गैरच होते.