शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भारतीय संगीतातच समाधीवस्थेची गुणवत्ता

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

- गायक शौनक अभिषेकी : शास्त्रीय संगीताला पर्याय नाही

- गायक शौनक अभिषेकी : शास्त्रीय संगीताला पर्याय नाही
ताराचंद राय : सुप्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी त्यांचे पिता गायक पं. जितेंद्र अभिषेकी यांची परंपरा समोर नेणारे गायक आहेत. शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यसंगीत, भावसंगीत आदी सर्वच प्रकारात प्रभुत्व असलेल्या शौनकजींच्या मते भारतीय संगीतातच संपूर्ण जगाला समाधीवस्थेपर्यंत नेण्याची शक्ती आहे. भारतीय संगीत संपूर्ण जगात लोकप्रिय होते आहे. विदेशात भारतीय संगीताचे कार्यक्रम वाढले आहेत. त्यामुळेच भारतीय संस्कृतीकडेही जगाचा ओढा वाढला असल्याचे मत त्यांनी लोकमतजवळ व्यक्त केले.
भारतात आतापर्यंत सुगम गायनाकडेच लोक वळत होते कारण शास्त्रीय संगीतात व्यावसायिक गायक होणे बेभरवशाचे होते. पण आता तशी स्थिती नाही त्यामुळे अनेक लोक शास्त्रीय संगीताकडे वळले आहेत. पालकही मुलांना शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत, ही समाधानाची बाब आहे. शास्त्रीय संगीत शिकणे तसेही आवश्यक आहे कारण त्यातूनच आपल्या परंपरेचे संचित आपल्यापर्यंत पोहोचते. वडील. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी जागतिक स्तरावरच्या कुठल्याही संगीताचा दुस्वास केला नाही. त्यापेक्षा त्यांनी मलाही वेगवेगळे संगीत ऐकण्याचा आणि संगीताकडे व्यापकतेने पाहण्याचा दृष्टिकोन दिला. याशिवाय केवळ शास्त्रीयच नव्हे तर भक्तीसंगीत, नाट्यसंगीत आणि उपशास्त्रीय संगीत हे संगीतच आहे. त्यामुळे त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नाही, हा संस्कार त्यांनी मला दिला. त्यामुळेच मी वेगवेगळ्या प्रकारात सादरीकरण करीत असतो. अनेक संगीत दिग्दर्शकांच्या हाताखाली मी चित्रपटांसाठी अभंग, भजन गायन केले आहे. शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटगीते मिळालीत तर ती देखील गायला मी तयार असतो.
विदेशात अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने जाणे होते आणि तेथे कलावंतांना खूप प्रतिष्ठा मिळते. पण भारतात मात्र त्या प्रमाणात प्रतिष्ठा मिळत नाही. भारतात जर कलावंतांना प्रतिष्ठा मिळाली तर प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याने संगीत शिकावे, असे वाटेल. यासाठी प्रत्येक वाहिनीवरुन शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम प्रसारित झाले पाहिजे. वडिलांनी आग्रा घराण्यासह जयपूर घराण्याचीही गायकी आत्मसात केली होती. त्यामुळे मीही दोन्ही घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला आणि याची संमिश्रता माझ्या गायनात आणून गायन अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न मी करीत असतो. लोकांना सध्या ते आवडते आहे, याचे समाधान वाटते, असे ते म्हणाले.