शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

पाकिस्तानात बेपत्ता झालेले भारतीय मौलवी परतले मायदेशी

By admin | Updated: March 20, 2017 13:23 IST

दिल्लीच्या हजरत निझामुद्दीन दर्ग्यामधील बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - दिल्लीच्या हजरत निझामुद्दीन दर्ग्यामधील बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले आहेत. पाकिस्तानत गेल्यावर मौलवी बेपत्ता झाल्याने दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. भारतात परतल्यानंतर दोन्ही मौलवींनी निजामुद्दीन दर्ग्याला भेट दिली. यावेळी बोलताना नाझिम निझामी यांनी 'पाकिस्तानमधील उम्मत नावाच्या एका वृत्तपत्राने आम्ही रॉचे एजंट असल्याची खोटी बातमी छापली होती. बातमीसोबत आमचे फोटोही प्रसिद्ध केले होते', असं सांगितंल. 
 
(आमचे मौलवी आम्हाला परत करा, भारताची पाकिस्तानला ताकीद)
(पाकिस्तानात बेपत्ता झालेले भारतीय मौलवी 20 मार्च रोजी परतणार मायदेशी)
 
आसिफ निजामी आणि त्यांचा भाऊ नाझिम निजामी धार्मिक यात्रेसाठी पाकिस्तानला गेले होते. मात्र तेथून अचानक ते बेपत्ता झाले. इस्लामाबादमधील भारतीय राजदूताने पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडे यासंबंधी तक्रारदेखील केली होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मौलवींचं इसीसने अपहरण केल्याची शंका व्यक्त केली जात होती.  
 
हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यातील दोन उलेमा पाकिस्तानध्ये जाऊन बेपत्ता झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला सक्त ताकीद देत लाहोरमधून बेपत्ता झालेल्या दोन्ही भारतीय नागरिकांशी संबंधित संपुर्ण माहिती पुरवण्यास सांगितलं होतं. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्वत: ट्विट करत भारताने पाकिस्तानसमोर हा मुद्दा उपस्थित केल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे आसिफ निजामी यांचा मुलगा आमीर निजामी याने सरकारकडे लवकरात लवकर पाऊल उलचण्याची विनंती केली होती. 
 
सईद आसिफ निजामी आणि त्यांचे पुतणे नाझिम निझामी १४ मार्च रोजी शाहिन एअरलाईन्सच्या विमानाने लाहोरहून कराचीला येणार होते. तथापि, लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांना विमानातून उतरवून चौकशीसाठी अज्ञात ठिकाणी नेण्यात आले होते, असे नाव गोपनिय ठेवण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितले. या दोघांना अल्ताफ हुसैन यांच्या एमक्यूएमशी असलेल्या कथित संबंधांवरून ताब्यात घेण्यात आले होते. कराचीतील एमक्यूएम कार्यकर्त्यांशी असलेल्या संबंधांबाबत त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांच्याविरुद्ध काहीही निष्पन्न न झाल्यास त्यांची सुटका करण्यात येईल, असे या सूत्रांनी स्पष्ट केले होते. 
 
एमक्यूएम सर्वात मोठा वांशिक पक्ष म्हणून १९८० मध्ये उदयास आला होता. त्याचे दक्षिण सिंधच्या शहरी भागात विशेष करून कराची, हैदराबाद, मिरपूरखास आणि सुक्कूर येथे प्रभुत्व आहे. १९४७च्या फाळणीदरम्यान भारतातून मोठ्या संख्येने पाकिस्तानात गेलेले उर्दु भाषिक लोक या भागांत स्थायिक झाले आहेत. ८० वर्षांचे आसिफ निजामी हजरत निझामुद्दीन दर्ग्याचे प्रमुख आहेत. कराचीतील बहिणीला भेटण्यासाठी ते आणि त्यांचे पुतणे नाजिम अली निजामी ८ मार्च रोजी पाकिस्तानला गेले होते. कराचीत नातेवाईकांकडे पाहुणचार घेतल्यानंतर ते १३ मार्च रोजी लाहोरला आले. तेथे सुफी संत बाबा फरिद यांच्या दर्ग्यात त्यांनी प्रार्थना केली. १४ मार्च रोजी ते कराचीला परतणार होते. मात्र, अचानक बेपत्ता झाले होते.