शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

भारतीय मेजरनं वाचवलं होतं बांगलादेशचं भविष्य

By admin | Updated: April 9, 2017 12:36 IST

भारत दौ-यावर असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी उजाळा दिला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - 1971मधलं भारत-पाक युद्ध फारच भयंकर होतं. या युद्धात भारतानं पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी त्याकाळी हे युद्ध लढलं गेलं होतं. त्याच आठवणींना भारत दौ-यावर असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी उजाळा दिला आहे. 46 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी एकत्रित 1971च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. या युद्धात मेजर अशोक तारा (निवृत्त) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. खरं तर मेजर तारांनीच युद्धात बांगलादेशातील पहिल्या परिवाराची पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप सुटका केली होती. कदाचित त्यावेळी त्यांच्या गावीही नसेल की आपण बांगलादेशच्या भावी पंतप्रधानांचा जीव वाचवला आहे. शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मेजर तारा यांची भेट झाली. भेटीनंतर 1971मधलं भारत-पाक युद्धाच्या आठवणींना हसीना यांनी उजाळा दिला. 1971मध्ये पाकिस्तानच्या 93,000 सैनिकांनी भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करल्यानंतर दुस-या दिवशी मेजर तारा यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. अशोक तारा यांना बंगबंधू शेख मुजिबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाचवण्याची मोहीम देण्यात आली. मुजिबुर रहमान यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानी लष्करानं धानमंडी भागातल्या एका घरात बंधक बनवलं होतं. बंधक बनवण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये मुजिबुर यांची पत्नी, 24 वर्षांची मुलगी शेख हसीना आणि त्यांच्या मुलाचा समावेश होता. या भाग ढाका एअरपोर्टपासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. तीन सैनिकांसह मेजर तारा यांनी शेख हसीना यांच्या कुटुंबीयांना सुखरूप सोडवलं. या युद्धात भारतानं 3,843 जवान गमावले. 13 दिवस चाललेल्या युद्धानंतर बांगलादेश स्वतंत्र झाला. त्यानंतर तारा यांचं बांगलादेशाशी एक अलौकिक नातं निर्माण झालं.