शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

भारतीय मेजरनं वाचवलं होतं बांगलादेशचं भविष्य

By admin | Updated: April 9, 2017 12:36 IST

भारत दौ-यावर असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी उजाळा दिला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - 1971मधलं भारत-पाक युद्ध फारच भयंकर होतं. या युद्धात भारतानं पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी त्याकाळी हे युद्ध लढलं गेलं होतं. त्याच आठवणींना भारत दौ-यावर असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी उजाळा दिला आहे. 46 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी एकत्रित 1971च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. या युद्धात मेजर अशोक तारा (निवृत्त) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. खरं तर मेजर तारांनीच युद्धात बांगलादेशातील पहिल्या परिवाराची पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप सुटका केली होती. कदाचित त्यावेळी त्यांच्या गावीही नसेल की आपण बांगलादेशच्या भावी पंतप्रधानांचा जीव वाचवला आहे. शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मेजर तारा यांची भेट झाली. भेटीनंतर 1971मधलं भारत-पाक युद्धाच्या आठवणींना हसीना यांनी उजाळा दिला. 1971मध्ये पाकिस्तानच्या 93,000 सैनिकांनी भारतीय लष्करासमोर शरणागती पत्करल्यानंतर दुस-या दिवशी मेजर तारा यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. अशोक तारा यांना बंगबंधू शेख मुजिबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाचवण्याची मोहीम देण्यात आली. मुजिबुर रहमान यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानी लष्करानं धानमंडी भागातल्या एका घरात बंधक बनवलं होतं. बंधक बनवण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये मुजिबुर यांची पत्नी, 24 वर्षांची मुलगी शेख हसीना आणि त्यांच्या मुलाचा समावेश होता. या भाग ढाका एअरपोर्टपासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. तीन सैनिकांसह मेजर तारा यांनी शेख हसीना यांच्या कुटुंबीयांना सुखरूप सोडवलं. या युद्धात भारतानं 3,843 जवान गमावले. 13 दिवस चाललेल्या युद्धानंतर बांगलादेश स्वतंत्र झाला. त्यानंतर तारा यांचं बांगलादेशाशी एक अलौकिक नातं निर्माण झालं.