शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

VIDEO: भारतीय तटरक्षक दलाकडून अरबी समुद्रात अडकलेल्या 264 मच्छिमारांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 07:40 IST

व्यापारी जहाजांच्या मदतीनं तटरक्षक दलाचं रेस्क्यू ऑपरेशन

मुंबई: भारतीय तटरक्षक दलानं व्यापारी जहाजांच्या मदतीनं अरबी समुद्रात अडकलेल्या २६४ मच्छिमारांची सुटका केली आहे. अचानक हवामान बिघडल्यानं मच्छिमारांच्या ५० बोटी समुद्रात अडकल्या होत्या. याबद्दलची माहिती तामिळनाडूमधील मच्छिमार संघटनांकडून भारतीय तटरक्षक दलाला मिळाली. पश्चिम गोव्यापासून २५० नॉटिकल मैल अंतरावर मच्छिमार बोटी अडकल्या होत्या. तटरक्षक दलानं तातडीनं मदतकार्य सुरू करत सर्व मच्छिमारांची सुखरुप सुटका केली. खराब हवामानामुळे ५० मच्छिमार बोटी समुद्रात अडकल्याची माहिती ३ डिसेंबरला भारतीय तटरक्षक दलाला मिळाली. भरसमुद्रात अडकलेल्या मच्छिमारांना तातडीनं मदत देणं गरजेचं असल्यानं तटरक्षक दलानं या भागात असणाऱ्या सात व्यापारी जहाजांशी संपर्क साधत त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. या जहाजांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे अडकलेल्या मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला. यानंतर लगेचच तटरक्षक दलाच्या बोटी मच्छिमारांच्या सुटकेसाठी रवाना झाल्या. भारतीय व्यापारी जहाज नवधेनू पूर्णानं ८६ मच्छिमारांची सुटका केली. तर जपानच्या एम व्ही तोवाडा जहाजानं ३४ मच्छिमारांची सुटका केली. भारतीय तटरक्षक दलाच्या विनंतीवरुन मॅरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटरनं या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. मॅरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटरच्या सूचनेवरुन आणखी पाच व्यापारी जहाजं या अभियानात सहभागी झाली. त्यामुळे २६४ मच्छिमारांची सुटका झाली.मच्छिमारांची सुटका केल्यानंतर त्यांना खाद्यपदार्थ आणि प्रथमोपचार देण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या सर्व मच्छिमारांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलानं दिली आहे. तटरक्षक दलाच्या समुद्र प्रहरी, समर, सावित्रीबाई फुले, अमल आणि अपूर्वा या जहाजांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. याशिवाय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टरदेखील या मोहिमेत सहभागी झालं होतं.  

 

टॅग्स :fishermanमच्छीमार