शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत, रोखणार 'या' तीन नद्यांचं पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 19:59 IST

मोदी सरकारमधल्या केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनीही सिंधू पाणी करारावर पुनर्विचार करणार असल्याचं सांगितलं आहे.

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवून जम्मू-काश्मीर आणि लडाखचं दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. भारताच्या या पावलानंतर पाकिस्ताननं हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु तिकडेही पाकिस्तान तोंडघशी पडले. मोदी सरकारमधल्या केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनीही सिंधू पाणी करारावर पुनर्विचार करणार असल्याचं सांगितलं आहे.सिंधू पाणी करारांतर्गत भारतातल्या मोठ्या हिस्स्याचं पाणी पाकिस्तानला जातं. आम्ही यावर वेगानं काम करत आहोत. आमच्या हक्काचं पाणी जे पाकिस्तानकडे जातं ते पुन्हा भारतात वळवून देशातल्या शेतकरी, काऱखानदार आणि इतर लोकांचा फायदा करून देण्याच्या प्रयत्नात आहोत. पुढे गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, हायड्रोलॉजिकल आणि टेक्नो फिजिबिलिटी स्टडीजवर आम्ही काम करत आहोत. रावी, व्यास आणि सतलज नदीचं पाणी भारतातून पाकिस्तानकडे जातं. त्यामुळे पाकिस्तानकडे जाणारं हे पाणी रोखण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत.जागतिक बँकेच्या पुढाकारातून भारत आणि पाकिस्तानने 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू जल करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार हिमालयात उगम पावणा-या आणि पाकिस्तानात प्रवेश करणा-या सहा नद्यांपैकी व्यास, रावी आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला आले, तर सिंधू, चिनाब आणि झेलम पश्चिमेकडील तीन नद्यांमधील पाण्याचा हक्क पाकिस्तानला मिळाला. यामध्ये भारताच्या वाट्याला 33 दशलक्ष एकर-फूट, तर पाकिस्तानच्या वाट्याला 80 दशलक्ष एकर-फूट पाणी आले. हे वाटप समन्यायी नसल्याने, भरपाई म्हणून भारताला पाकिस्तानच्या वाट्याच्या तीन नद्यांमधील पाण्याचा सिंचनासाठी मर्यादित आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी अमर्यादित वापर करण्याचा अधिकार देण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी रोखण्याची घोषणा केल्यानंतर सिंधू जल करार पुन्हा एकदा चर्चेत आला. भारताने पाणी अडवले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानकडूनही देण्यात आली. गडकरी केवळ व्यास, रावी आणि सतलज या नद्यांच्या पाण्याबाबतच बोलत असल्याची खात्री असल्यामुळे पाकिस्तान निर्धास्त असावा; मात्र जर भारताने सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांचेही पाणी अडविण्याची भूमिका घेतली तर मात्र पाकिस्तानवर पाण्यासाठी अक्षरश: तरसण्याची वेळ येणार आहे.

पाकिस्तानकडे एकूण 1450 लाख एकर फूट पाणी उपलब्ध आहे. त्यापैकी तब्बल 1160 लाख एकर फूट पाणी त्या देशाला केवळ सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांच्या माध्यमातून उपलब्ध होते. त्यापैकी निम्मे पाणी जरी भारताने रोखले तरी पाकिस्तानची काय अवस्था होईल, याची कल्पना कुणीही करू शकतो. भारताला या तीन नद्यांचे पाणी रोखण्यासाठी सिंधू जल करारातून बाहेर पडावे लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी