शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

भारत पहिली गोळी चालवणार नाही

By admin | Updated: September 12, 2015 02:57 IST

आपल्या शेजारी देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास भारत इच्छुक आहे. त्यामुळे आमच्याकडून पाकिस्तानच्या दिशेने पहिली गोळी सुटणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह

नवी दिल्ली : आपल्या शेजारी देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास भारत इच्छुक आहे. त्यामुळे आमच्याकडून पाकिस्तानच्या दिशेने पहिली गोळी सुटणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी सीमा प्रश्नांवर चर्चेसाठी आलेल्या पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाला दिली.यावर पाकिस्तान रेंजर्सचे महासंचालक मेजर जनरल उमर फारुख बुर्की यांनी मात्र आपल्या देशाच्या वतीने कुठलीही वचनबद्धता जाहीर करण्यास असमर्थता दर्शविली. गृहमंत्र्यांप्रमाणे मी नेतृत्वाचा हिस्सा नसून केवळ एका दलाचा महासंचालक आहे. त्यामुळे सिंग यांचा हा संदेश मी आमच्या देशाच्या नेतृत्वापर्यंत निश्चित पोहोचता करेन, असे ते म्हणाले.बुर्की यांच्या नेतृत्वातील पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळ सीमा प्रश्नावर चर्चेकरिता तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहे. पाकिस्तानच्या बाजूने भारतात कुठल्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचनाही सिंग यांनी केली. भारत व पाकिस्तानने दहशतवादाच्या धोक्याचा एकजुटीने सामना केला पाहिजे, असे मत व्यक्त करताना ते म्हणाले की, दोन्ही देश दहशतवादाने पीडित असून पाकिस्तानसोबत विविध स्तरावर चर्चा करण्याची भारताची मनीषा आहे. त्या अनुषंगानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे रशियाच्या उफा येथे पाकिस्तानातील त्यांचे समकक्ष नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. दुर्दैवाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) स्तरावरील चर्चा होऊ शकली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)