शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो तरी भारत हा अतुल्यच राहणार - आमिर खान

By admin | Updated: January 7, 2016 18:22 IST

अभिनेता आमिर खानला अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन काढून टाकण्यात आल्याचे वृत्त काल झळाकले. त्यावर पर्यटन विभागाने आमिर खानसोबत अतुल्य भारत

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ७ - अभिनेता आमिर खानला अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन काढून टाकण्यात आल्याचे वृत्त काल झऴकले. त्यावर पर्यटन विभागाने आमिर खानसोबत अतुल्य भारत मोहिमेसाठी झालेला करार संपला असून त्याला काढले नसल्याचा दावा करत मिडीयामध्ये आलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. 
मात्र, यावर आमिर खाने मिडीयाशी बोलताना सांगितले की, गेली दहा वर्षे मी अतुल्य भारत मोहिमेचा ब्रॅण्ड अॅम्बेसडर होतो. हा माझ्यासाठी मोठा सन्मान समजतो. देशाची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान आहे. यापुढेही देशाची सेवा करण्यास तयार आहे. आत्तापर्यंत मी पब्लिक सर्व्हिस फिल्मसाठी मोफत काम करत आलो आहे. अशाप्रकारे मला देशाची सेवा करण्यासाठी संधी मिऴाली, त्यामुळे मला हा मिऴालेला सन्मान समजतो. अतुल्य भारत मोहिमेसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसडर असावा की नाही, असल्यास कोण असावा हे ठरविण्याचा अधिकार सरकारचा आहे. त्यामुळे अतुल्य भारत मोहिमेसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन मला काढण्याचा सरकारच्या निर्णयाचा मी आदर करतो. सरकारकडून देशासाठी जे सर्वोत्तम असेल, त्याचदृष्टीने पुढची पावलं उचलली जातील अशी मला खात्री आहे. तसेच, मी ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो तरी आपला देश हा अतुल्यच राहणार असल्याचे आमिर खानने सांगितले.