शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भारत करणार शस्त्रास्त्र सामग्रींची खरेदी, नव्या धोरणानुसार कंपन्यांवर अटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:19 IST

चीन व पाकिस्तान या शेजारी देशांकडून असलेला धोका लक्षात घेता आगामी काळासाठी भारताला ताफ्यात अत्याधुनिक लढाऊ विमाने, वाहने, पाणबुड्या आणि हेलिकॉप्टर्सचा समावेश करावा लागणार आहे.

नवी दिल्ली : चीन व पाकिस्तान या शेजारी देशांकडून असलेला धोका लक्षात घेता आगामी काळासाठी भारताला ताफ्यात अत्याधुनिक लढाऊ विमाने, वाहने, पाणबुड्या आणि हेलिकॉप्टर्सचा समावेश करावा लागणार आहे. ही सर्व सामग्री खरेदी करण्यासाठी भारताची योजनाही तयार आहे. अब्जावधी डॉलर्सचा हा व्यवहार प्रत्यक्षात त्याचवेळी करण्यात येईल, तसेच कंपन्या या सामग्रीची 'मेड इन इंडिया' पद्धतीने निर्मिती करतील.जगभरातील शस्त्रास्त्रांचा सर्वात मोठा आयातदार देश असलेल्या भारताने शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी नवीन धोरण आखले आहे. नव्या धोरणात संरक्षण साहित्यांची निर्मिती करणा-या कंपन्यांना भारतात येऊन कारखाने सुरू करावेत, अशी अट घालण्यात आली आहे. पाणबुड्या निर्मितीच्या कार्यक्रमासाठी पुढील जुलै महिन्यात निविदा काढण्यात येणार आहेत. या धोरणामुळे भारतात रोजगार निर्मितीला चालना मिळेल तसेच, मुख्य म्हणजे संरक्षणविषयक तंत्रज्ञान भारताला उपलब्ध होऊ शकेल. अनेक परदेशी कंपन्यांनीही नवीन धोरणानुसार भारतासाठी आणि भारतात शस्त्रास्त्रनिर्मितीमध्ये रस दाखवला आहे. युरोपियन एअरबस ही कंपनी पँथर हेलिकॉप्टर्स विकण्याचा प्रयत्न करत आहे. भारताकडून कंपनीला अब्जावधी डॉलर्सचे कंत्राट मिळाल्यास इथेच मुख्य केंद्र स्थापन करू, असे एअरबसने म्हटले आहे.दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन कंपनीने भारतामध्ये एफ-१६ पद्धतीची लढाऊ विमाने बनवण्याची घोषणा केली होती. यासंदर्भात लॉकहीड मार्टिन आणि टाटा उद्योग समूहामध्ये पॅरिस एअर शोमध्ये अधिकृत करार झाला.