शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

भारत ‘स्टार्ट अप’चे केंद्र होईल !

By admin | Updated: July 24, 2016 02:02 IST

स्टार्ट अप इंडिया या महत्वाकांक्षी योजनेत नोंदणी करणाऱ्या उद्योगांना मदत करण्याच्या भूमिकेत केंद्र सरकार आहे. या कंपन्यांच्या मार्गात सरकार कोणतेही अडथळे निर्माण करू इच्छित नाही

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

स्टार्ट अप इंडिया या महत्वाकांक्षी योजनेत नोंदणी करणाऱ्या उद्योगांना मदत करण्याच्या भूमिकेत केंद्र सरकार आहे. या कंपन्यांच्या मार्गात सरकार कोणतेही अडथळे निर्माण करू इच्छित नाही, तथापि सरकारी आर्थिक सहाय्याचा लाभ घेत या कंपन्या उत्पन्न मिळवीत असतील, तर त्यात पारदर्शकताही आवश्यक आहे. आयकर विवरणपत्रे त्यांना भरावीच लागतील, अशी माहिती वाणिज्य विभागाच्या स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.भारतात जानेवारी महिन्यात स्टार्ट अप योजना लाँच झाल्यावर त्याला नेमका किती प्रतिसाद मिळाला, याचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, लाँचिंगनंतर ४४00 तंत्रज्ञान स्टार्ट अप कंपन्यांनी नोंदणी केली आहे आणि २0२0 पर्यंत १२ हजार तंत्रज्ञान स्टार्ट अप कंपन्यांच्या नोंदणीचे लक्ष्य आहे. आजवर ज्यांनी स्टार्ट अपची नोंदणी केली त्यातले ७0 टक्के संचालक ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. अमेरिका आणि ब्रिटननंतर भारत स्टार्ट अप कंपन्यांचा लवकरच तिसरा मोठा हब बनण्याच्या मार्गावर आहे.स्टार्ट अप योजना नव्या उद्योजकांना उत्तेजन आणि प्रोत्साहन देण्यासाठी आहे. मात्र योजनेसाठी करदात्यांचा पैसा खर्च होत असेल तर त्याचे उत्तरदायित्वही असले पाहिजे, असे सांगून त्या म्हणाल्या की, देशातील राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश यांच्या प्रमुखांशी चर्चा करून स्टार्ट अपची अधिकाधिक केंद्रे विकसित करण्याचा सरकारचा इरादा आहे. १३ केंद्रे स्थापनेचा प्रस्तावसरकारने आत्तापर्यंत २५0 पेक्षा अधिक इन्क्युबेटर्सना मान्यता दिली आहे. राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांच्या सल्लागार समितीने ७ संशोधन पार्क, १६ तंत्रज्ञान व्यवसाय इनक्युबेटर्स व १३ स्टार्ट अप केंद्रे स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे.