शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

भारत ‘स्टार्ट अप’चे केंद्र होईल !

By admin | Updated: July 24, 2016 02:02 IST

स्टार्ट अप इंडिया या महत्वाकांक्षी योजनेत नोंदणी करणाऱ्या उद्योगांना मदत करण्याच्या भूमिकेत केंद्र सरकार आहे. या कंपन्यांच्या मार्गात सरकार कोणतेही अडथळे निर्माण करू इच्छित नाही

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

स्टार्ट अप इंडिया या महत्वाकांक्षी योजनेत नोंदणी करणाऱ्या उद्योगांना मदत करण्याच्या भूमिकेत केंद्र सरकार आहे. या कंपन्यांच्या मार्गात सरकार कोणतेही अडथळे निर्माण करू इच्छित नाही, तथापि सरकारी आर्थिक सहाय्याचा लाभ घेत या कंपन्या उत्पन्न मिळवीत असतील, तर त्यात पारदर्शकताही आवश्यक आहे. आयकर विवरणपत्रे त्यांना भरावीच लागतील, अशी माहिती वाणिज्य विभागाच्या स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.भारतात जानेवारी महिन्यात स्टार्ट अप योजना लाँच झाल्यावर त्याला नेमका किती प्रतिसाद मिळाला, याचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, लाँचिंगनंतर ४४00 तंत्रज्ञान स्टार्ट अप कंपन्यांनी नोंदणी केली आहे आणि २0२0 पर्यंत १२ हजार तंत्रज्ञान स्टार्ट अप कंपन्यांच्या नोंदणीचे लक्ष्य आहे. आजवर ज्यांनी स्टार्ट अपची नोंदणी केली त्यातले ७0 टक्के संचालक ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. अमेरिका आणि ब्रिटननंतर भारत स्टार्ट अप कंपन्यांचा लवकरच तिसरा मोठा हब बनण्याच्या मार्गावर आहे.स्टार्ट अप योजना नव्या उद्योजकांना उत्तेजन आणि प्रोत्साहन देण्यासाठी आहे. मात्र योजनेसाठी करदात्यांचा पैसा खर्च होत असेल तर त्याचे उत्तरदायित्वही असले पाहिजे, असे सांगून त्या म्हणाल्या की, देशातील राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश यांच्या प्रमुखांशी चर्चा करून स्टार्ट अपची अधिकाधिक केंद्रे विकसित करण्याचा सरकारचा इरादा आहे. १३ केंद्रे स्थापनेचा प्रस्तावसरकारने आत्तापर्यंत २५0 पेक्षा अधिक इन्क्युबेटर्सना मान्यता दिली आहे. राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांच्या सल्लागार समितीने ७ संशोधन पार्क, १६ तंत्रज्ञान व्यवसाय इनक्युबेटर्स व १३ स्टार्ट अप केंद्रे स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे.