शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

भारत आता पाकसोबत हवाई संपर्कही तोडणार?

By admin | Updated: September 30, 2016 05:20 IST

उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढविण्यासाठी पाकशी हवाई संपर्क तोडण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा असून

नवी दिल्ली: उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढविण्यासाठी पाकशी हवाई संपर्क तोडण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा असून,एकमेकांना हवाई हद्दींचा वापर करण्याची परवानगीही दिली आहे. हे यापुढे सुरू ठेवायचा की नाही याचा विचार मोदी सरकार करीत आहे. पंतप्रधान कार्यालयाने आम्हाला उभय देशांमधील द्विपक्षीय उड्डयण करार आणि आमच्या हवाई हद्दीतून उडणाऱ्या पाकिस्तानी विमानसेवांबद्दल सविस्तर माहिती मागितली असून यासंदर्भातील अंतिम निर्णय पीएमओ स्तरावरच घेतला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय विमान कंपनी पाकिस्तानात उड्डाणसेवा देत नाही. परंतु पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सची दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय कराराअंतर्गत भारत आणि पाकिस्तानातील विमानसेवांना एकमेकांच्या देशात आठवड्यात २८ वेळा सेवा संचलनाची परवानगी मिळाली आहे. भारताने २००१ साली संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत हवाई संपर्क तोडला होता. त्यावेळी तत्कालीन इंडियन एअरलाईन्सने पाकिस्तानला जाणारी विमाने बंद केली होती. सरकारने पाकिस्तानी एअरलाईन्सलाही भारतीय हवाई हद्दीचा वापर करण्यास मज्जाव केला होता. याच्या प्रत्युत्तरात पाकनेही भारतीय विमान कंपन्यांवर निर्बंध घातले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क) तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या निर्णयाने पाकिस्तानपेक्षा भारतीय विमान कंपन्यांचेच अधिक नुकसान होणार आहे. कारण पश्चिमेकडे उड्डाण भरणाऱ्या भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानी हवाई हद्द टाळण्याकरिता लांबचा मार्ग घ्यावा लागेल. त्यामुळे अधिक इंधन खर्च होईल आणि प्रवासाची वेळही वाढेल.