शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

भारत आता पाकसोबत हवाई संपर्कही तोडणार?

By admin | Updated: September 30, 2016 05:20 IST

उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढविण्यासाठी पाकशी हवाई संपर्क तोडण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा असून

नवी दिल्ली: उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढविण्यासाठी पाकशी हवाई संपर्क तोडण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा असून,एकमेकांना हवाई हद्दींचा वापर करण्याची परवानगीही दिली आहे. हे यापुढे सुरू ठेवायचा की नाही याचा विचार मोदी सरकार करीत आहे. पंतप्रधान कार्यालयाने आम्हाला उभय देशांमधील द्विपक्षीय उड्डयण करार आणि आमच्या हवाई हद्दीतून उडणाऱ्या पाकिस्तानी विमानसेवांबद्दल सविस्तर माहिती मागितली असून यासंदर्भातील अंतिम निर्णय पीएमओ स्तरावरच घेतला जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय विमान कंपनी पाकिस्तानात उड्डाणसेवा देत नाही. परंतु पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सची दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय कराराअंतर्गत भारत आणि पाकिस्तानातील विमानसेवांना एकमेकांच्या देशात आठवड्यात २८ वेळा सेवा संचलनाची परवानगी मिळाली आहे. भारताने २००१ साली संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत हवाई संपर्क तोडला होता. त्यावेळी तत्कालीन इंडियन एअरलाईन्सने पाकिस्तानला जाणारी विमाने बंद केली होती. सरकारने पाकिस्तानी एअरलाईन्सलाही भारतीय हवाई हद्दीचा वापर करण्यास मज्जाव केला होता. याच्या प्रत्युत्तरात पाकनेही भारतीय विमान कंपन्यांवर निर्बंध घातले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क) तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या निर्णयाने पाकिस्तानपेक्षा भारतीय विमान कंपन्यांचेच अधिक नुकसान होणार आहे. कारण पश्चिमेकडे उड्डाण भरणाऱ्या भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानी हवाई हद्द टाळण्याकरिता लांबचा मार्ग घ्यावा लागेल. त्यामुळे अधिक इंधन खर्च होईल आणि प्रवासाची वेळही वाढेल.