शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

भारत - ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाबाबत चर्चा

By admin | Updated: February 23, 2017 00:53 IST

आरोपींचे प्रत्यार्पण करून, त्यांना स्वदेशी परत पाठविण्याच्या मुद्द्यावरील प्रलंबित प्रकरणांवर मंगळवारी भारत आणि

नवी दिल्ली : आरोपींचे प्रत्यार्पण करून, त्यांना स्वदेशी परत पाठविण्याच्या मुद्द्यावरील प्रलंबित प्रकरणांवर मंगळवारी भारत आणि ब्रिटन यांच्यात मंगळवारी चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटन विभागाचे संयुुक्त सचिव यांनी आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. किंगफिशर एअरलाइन्सचा मालक आणि मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने ब्रिटनकडे विनंती केल्यानंतर काही आठवड्यातच ही बैठक झाली आहे, हे विशेष. मनी लाँड्रिंग प्रकरणात विजय मल्ल्याच्या विरोधात चौकशी सुुरू आहे. विजय मल्ल्या याच्यावर बँकांचे ९०० कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याचा आरोप आहे. ब्रिटनमधून भारतात परत पाठविण्याच्या प्रकरणासह अन्य प्रकरणांवर यात चर्चा झाली. नोव्हेंबरमध्ये भारताने ब्रिटनमधून मल्ल्यासह ६० जणांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. शस्त्रास्त्र खरेदीतील दलाल संजय भंडारी हाही ब्रिटनमध्ये असून, तोही भारताला हवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटीश पंतप्रधान टेरेसा मे यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत ब्रिटनला त्या ६0 जणांची यादीही सोपविण्यात आली होती. ब्रिटननेही भारताला १७ लोकांची यादी सोपविली होती. भारतानेही त्या १७ जणांना ब्रिटनमध्ये परत पाठविणे अपेक्षित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)भारताला हवा आहे मल्ल्या या बैठकीची अधिकृत माहिती समजू शकली नसली, तरी विजय मल्ल्याला परत आणण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केल्याचे समजले जात आहेत. मल्ल्यासह ६० जण भारताला हवे आहेत. मद्यसम्राट विजय मल्ल्या भारतातून पळून गेला असून, तो सध्या ब्रिटनमध्ये आहे. त्याने देशातील बँकांचे कोट्यवधींचे कर्ज थकविले आहे.