शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जगातील सर्वाधिक एचआयव्ही रुग्णांमध्ये भारत तिसरा

By admin | Updated: July 17, 2014 12:45 IST

जगात सर्वाधिक एचआयव्ही रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत तिस-या स्थानावर असून आशियातील १० एचआयव्ही रुग्णांपैकी ४ रुग्ण हे भारतातील असल्याचे माहिती समोर आली आहे.

 

ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. १७ - जगात सर्वाधिक एचआयव्ही रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत तिस-या स्थानावर असून आशियातील १० एचआयव्ही रुग्णांपैकी ४ रुग्ण हे भारतातील असल्याचे माहिती समोर आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे २००५ ते २०१३ या कालावधीत भारतात एचआयव्ही बाधित रुग्णांचे प्रमाण १९ टक्क्यांनी घटले आहे. 
संयुक्त राष्ट्र संघाने एचआयव्ही - एड्स संदर्भात बुधवारी एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात भारतातील एचआयव्ही रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे. २०१३ मध्ये आशियात एड्समुळे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी तब्बल ५१ टक्के रुग्ण हे भारतातील होते. तर जागतिक स्तरावर हेच प्रमाण ८ टक्के ऐवढे होते. २०१३ च्या अखेरीस देशातील ७ लाख रुग्णांवर अँटी
रिट्रीव्हायरल थिरपीद्वारे (एआरटी) उपचार सुरु होते. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांवर एआरटीद्वारे उपचार करणा-या देशांच्या यादीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो असे दिलासादायक चित्र दिसते. गेल्या आठ वर्षात देशातील एचआयव्हीची लागण झालेल्या नवीन रुग्णांचे प्रमाण १९ टक्क्यांनी घटले असून याचे श्रेय समाजसेवा संस्था आणि सरकारी आरोग्य यंत्रणांना द्यायला हवे. मात्र रुग्णांचे प्रमाण घटत असले तरी आशियातील एकूण एचआयव्हीची लागण होणा-या नवीन रुग्णांपैकी ३८ टक्के रुग्ण हे भारतातीलच आहे. म्हणजेच प्रमाण घटत असले तरी भारतात अन्य देशांच्या तुलनेत एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशात एचआयव्ही - एड्समुळे मृत्यू होणा-या रुग्णांचे प्रमाणही ३८ टक्क्यांनी घटले आहे. 
भारतातील महिला एचआयव्ही रुग्णांमध्ये ७५ टक्के बाधित महिलांचे पती हे कामानिमित्त बाहेरच असतात. त्यांचे पती ट्रकचालक, कंत्राटी मजूर अशी काम करतात. काही राज्यांमध्ये हे प्रमाण ९० टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. 
मुंबईतील रेड लाईट वस्त्यांमधील भीषण वास्तवही या अहवालातून समोर येते. मुंबईतील सुमारे २३ टक्के वारांगना या एचआयव्ही बाधित आहेत. यातील बहुसंख्य महिलांना जबरदस्तीने देहविक्रय करण्यास भाग पाडण्यात आले.