शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वाधिक एचआयव्ही रुग्णांमध्ये भारत तिसरा

By admin | Updated: July 17, 2014 12:45 IST

जगात सर्वाधिक एचआयव्ही रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत तिस-या स्थानावर असून आशियातील १० एचआयव्ही रुग्णांपैकी ४ रुग्ण हे भारतातील असल्याचे माहिती समोर आली आहे.

 

ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. १७ - जगात सर्वाधिक एचआयव्ही रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत तिस-या स्थानावर असून आशियातील १० एचआयव्ही रुग्णांपैकी ४ रुग्ण हे भारतातील असल्याचे माहिती समोर आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे २००५ ते २०१३ या कालावधीत भारतात एचआयव्ही बाधित रुग्णांचे प्रमाण १९ टक्क्यांनी घटले आहे. 
संयुक्त राष्ट्र संघाने एचआयव्ही - एड्स संदर्भात बुधवारी एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात भारतातील एचआयव्ही रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे. २०१३ मध्ये आशियात एड्समुळे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी तब्बल ५१ टक्के रुग्ण हे भारतातील होते. तर जागतिक स्तरावर हेच प्रमाण ८ टक्के ऐवढे होते. २०१३ च्या अखेरीस देशातील ७ लाख रुग्णांवर अँटी
रिट्रीव्हायरल थिरपीद्वारे (एआरटी) उपचार सुरु होते. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांवर एआरटीद्वारे उपचार करणा-या देशांच्या यादीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो असे दिलासादायक चित्र दिसते. गेल्या आठ वर्षात देशातील एचआयव्हीची लागण झालेल्या नवीन रुग्णांचे प्रमाण १९ टक्क्यांनी घटले असून याचे श्रेय समाजसेवा संस्था आणि सरकारी आरोग्य यंत्रणांना द्यायला हवे. मात्र रुग्णांचे प्रमाण घटत असले तरी आशियातील एकूण एचआयव्हीची लागण होणा-या नवीन रुग्णांपैकी ३८ टक्के रुग्ण हे भारतातीलच आहे. म्हणजेच प्रमाण घटत असले तरी भारतात अन्य देशांच्या तुलनेत एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशात एचआयव्ही - एड्समुळे मृत्यू होणा-या रुग्णांचे प्रमाणही ३८ टक्क्यांनी घटले आहे. 
भारतातील महिला एचआयव्ही रुग्णांमध्ये ७५ टक्के बाधित महिलांचे पती हे कामानिमित्त बाहेरच असतात. त्यांचे पती ट्रकचालक, कंत्राटी मजूर अशी काम करतात. काही राज्यांमध्ये हे प्रमाण ९० टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. 
मुंबईतील रेड लाईट वस्त्यांमधील भीषण वास्तवही या अहवालातून समोर येते. मुंबईतील सुमारे २३ टक्के वारांगना या एचआयव्ही बाधित आहेत. यातील बहुसंख्य महिलांना जबरदस्तीने देहविक्रय करण्यास भाग पाडण्यात आले.