शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र करावे - नाएला कादरी बलोच

By admin | Updated: May 2, 2016 13:04 IST

भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये ज्या प्रमाणे पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करुन बांगलादेशची निर्मिती केली.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २ - भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये ज्या प्रमाणे पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करुन बांगलादेशची निर्मिती केली. त्याप्रमाणे भारताने आता बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे असे विधान बलुचिस्तानातील महिला नेत्या नाएल कादरी बलोच यांनी केले आहे. 
 
भारताने आपल्या बलुचिस्तान संदर्भातील धोरणात बदल करावा यासाठी जनमत तयार करण्यासाठी त्यांचा भारतातील एका शहरातून दुस-या शहरात प्रवास सुरु आहे. यापूर्वीही बलुचिस्तानातील नेत्यांनी अशी मागणी केली आहे. पण भारताने या मागणीला फारसे गांर्भीयाने घेतले नाही. 
 
पाकिस्तानने अनेकदा भारतावर बलुचिस्तानात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. नाएला बलुच नेत्या आहेत ज्यांना भारतात येऊन स्वतंत्र, धर्मनिरपेक्ष बलुचिस्तानचा मुद्या मांडण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारत आणि जगाने बलुचिस्तानच्या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करुन बलुचि जनतेवर पाकिस्तानकडून सुरु असलेला अत्याचार थांबवावा. 
 
अन्यथा बलुच बंडखोरांना पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारावे लागेल. आतापर्यंत बलुची जनतेने पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही. पाकिस्तानकडून हल्ले होत असताना आम्ही फक्त आमचे संरक्षण करत आहोत. पण आम्ही अजून किती काळ थांबायचे ? हे युद्ध पाकिस्तानात सुरु होईल असा इशारा त्यांनी दिला. नाएला आणि तिचे कुटुंबिय कॅनडामध्ये विजनवासात रहात आहेत.