शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

भारतात पुन्हा धक्के; बळीसंख्या ६२

By admin | Updated: April 27, 2015 00:43 IST

नेपाळसह भारतात शनिवारी आलेल्या भूकंपातून सावरण्याचे प्रयत्न सुरू असतानाच रविवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह पूर्व व उत्तर भारतातील अनेक

नवी दिल्ली : नेपाळसह भारतात शनिवारी आलेल्या भूकंपातून सावरण्याचे प्रयत्न सुरू असतानाच रविवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह पूर्व व उत्तर भारतातील अनेक भागाला उच्च तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.९ एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये होते. दरम्यान, देशात शनिवारी आलेल्या भूकंपात आतापर्यंत ६२ बळी गेले असून २५९ जण जखमी झाले आहेत. बिहारात रविवारी भूकंपबळींची संख्या वाढून ४६ वर पोहोचली. राज्याच्या पूर्व चंपारण्य भागात सर्वाधिक आठ, तर सीतामढी आणि दरभंगामध्ये प्रत्येक सहा जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील बळींची संख्या १३ झाली आहे.पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील अनेक राज्यांत दुपारी १२.४२ मिनिटाला सुमारे १० मिनिटे भूकंपाचे हादरे जाणवले. यामुळे लोकांमध्ये एकच दहशत निर्माण झाली आणि लोक आपली घरे व कार्यालयातून बाहेर पडून रस्त्यांवर आली. या ताज्या धक्क्यामुळे देशात कुठेही कुठल्याही प्राणहानीचे वृत्त नाही.बिहारातही ६.७ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. कालच्या भूकंपात बिहारातील ४२ लोक मृत्युमुखी पडल्यानंतर आजच्या ताज्या धक्क्यांनी सर्वत्र दहशत पसरली. लोक तात्काळ आपल्या घर व कार्यालयांतून रस्त्यांवर आले. उत्तर प्रदेशात लखनौ, कानपूर, संत कबीरनगर, फैजाबाद, बहराईच, बलिया, महाराजगंज, कुशीनगर, अमेठी, उन्नाव आदी अनेक जिल्ह्यात १२ वाजून ४३ मिनिटाला सुमारे ४५ सेकंदापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेशात शनिवारी बहुतांश जिल्हे भूकंपाने हादरले होते. यात १३ ठार तर ४० पेक्षा अधिक जखमी झाले होते. तथापि, रविवारच्या या ताज्या धक्क्यानंतर कुठल्याही हानीचे वृत्त नाही. राज्य सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून दोन दिवस सर्व शाळा बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. चंदीगडवरून प्राप्त माहितीनुसार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कोलकातात बेहाला, गरिया, लेकटाऊन, साल्ट लेक आदी भागांत भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपानंतर मेट्रोसेवा अस्थायी रूपात काही वेळ रोखण्यात आली. मुख्यमंत्रीही ‘हादरले’बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी भूकंपासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक बोलवली होती. याचदरम्यान अचानक भूकंपाने जमीन हादरली. यानंतर नितीशकुमार आणि मंत्रिमंडळाचे अन्य सदस्य व अधिकारी बैठकीच्या ठिकाणावरून बाहेर पडले.