शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
5
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
6
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
7
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
8
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
9
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
10
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
11
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
13
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
14
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
15
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
16
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
17
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
18
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
19
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
20
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

भारतात पुन्हा धक्के; बळीसंख्या ६२

By admin | Updated: April 27, 2015 00:43 IST

नेपाळसह भारतात शनिवारी आलेल्या भूकंपातून सावरण्याचे प्रयत्न सुरू असतानाच रविवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह पूर्व व उत्तर भारतातील अनेक

नवी दिल्ली : नेपाळसह भारतात शनिवारी आलेल्या भूकंपातून सावरण्याचे प्रयत्न सुरू असतानाच रविवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह पूर्व व उत्तर भारतातील अनेक भागाला उच्च तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.९ एवढी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये होते. दरम्यान, देशात शनिवारी आलेल्या भूकंपात आतापर्यंत ६२ बळी गेले असून २५९ जण जखमी झाले आहेत. बिहारात रविवारी भूकंपबळींची संख्या वाढून ४६ वर पोहोचली. राज्याच्या पूर्व चंपारण्य भागात सर्वाधिक आठ, तर सीतामढी आणि दरभंगामध्ये प्रत्येक सहा जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील बळींची संख्या १३ झाली आहे.पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील अनेक राज्यांत दुपारी १२.४२ मिनिटाला सुमारे १० मिनिटे भूकंपाचे हादरे जाणवले. यामुळे लोकांमध्ये एकच दहशत निर्माण झाली आणि लोक आपली घरे व कार्यालयातून बाहेर पडून रस्त्यांवर आली. या ताज्या धक्क्यामुळे देशात कुठेही कुठल्याही प्राणहानीचे वृत्त नाही.बिहारातही ६.७ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. कालच्या भूकंपात बिहारातील ४२ लोक मृत्युमुखी पडल्यानंतर आजच्या ताज्या धक्क्यांनी सर्वत्र दहशत पसरली. लोक तात्काळ आपल्या घर व कार्यालयांतून रस्त्यांवर आले. उत्तर प्रदेशात लखनौ, कानपूर, संत कबीरनगर, फैजाबाद, बहराईच, बलिया, महाराजगंज, कुशीनगर, अमेठी, उन्नाव आदी अनेक जिल्ह्यात १२ वाजून ४३ मिनिटाला सुमारे ४५ सेकंदापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेशात शनिवारी बहुतांश जिल्हे भूकंपाने हादरले होते. यात १३ ठार तर ४० पेक्षा अधिक जखमी झाले होते. तथापि, रविवारच्या या ताज्या धक्क्यानंतर कुठल्याही हानीचे वृत्त नाही. राज्य सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून दोन दिवस सर्व शाळा बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. चंदीगडवरून प्राप्त माहितीनुसार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कोलकातात बेहाला, गरिया, लेकटाऊन, साल्ट लेक आदी भागांत भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपानंतर मेट्रोसेवा अस्थायी रूपात काही वेळ रोखण्यात आली. मुख्यमंत्रीही ‘हादरले’बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी भूकंपासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक बोलवली होती. याचदरम्यान अचानक भूकंपाने जमीन हादरली. यानंतर नितीशकुमार आणि मंत्रिमंडळाचे अन्य सदस्य व अधिकारी बैठकीच्या ठिकाणावरून बाहेर पडले.