शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

प्रत्युत्तर देण्यास भारत सज्ज

By admin | Updated: October 1, 2016 01:55 IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पाकिस्तान सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतला. तासभर चाललेल्या या बैठकीला वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. त्यांनी गृहमंत्र्यांना

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पाकिस्तान सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतला. तासभर चाललेल्या या बैठकीला वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. त्यांनी गृहमंत्र्यांना सीमेवरील परिस्थितीची माहिती दिली. पाकिस्तानच्या प्रत्येक कारस्थानाला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी या अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमावर्ती भागातील नागरिकांच्या सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांची माहितीही देण्यात आली. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील तणाव वाढला आहे. यामुळे सीमेवर सैन्याने सतर्क राहण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल, केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षि, सुरक्षा व गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सीमेवरील आपल्या तुकड्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जम्मू, पंजाब, राजस्थान व गुजरातच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील जवानांना गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौक्यांवरील जवानांची संख्याही वाढविण्यात आली आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने सुरक्षा दलाला आदेश दिले आहेत की, सीमावर्ती भागातील नागरिकांना सुरक्षित जागी पोहचविण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मदत करावी. (लोकमत न्यूज नेटवर्क) पाक कलावंत म्हणजे दहशतवादी नव्हेतभारतीय लष्कराने पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे समर्थन करतानाच अभिनेता सलमान खान याने पाकिस्तानी कलाकार म्हणजे दहशतवादी नव्हेत. त्यामुळे त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालण्याची भूमिका योग्य नाही, असे म्हटले आहे. ते भारतीय व्हिसाच्या आधारे इथे येतात. त्यामुळे त्यांना इथे येण्याची परवानगी मिळालेली असते. असे असताना त्यांच्यावर बंदी कशासाठी, असा सवालच सलमान खानने केला. या वक्तव्यामुळे पुन्हा सलमान अडचणीत येण्याची शक्यता दिसत होती. त्याने या वादात पडण्याचे कारण नव्हते. स्वत:चे हे मत त्याने जाहीरपणे सांगितले नसते, तर काहीच बिघडले नसते. आता निष्कारण त्याच्याविरुद्ध वातावरण तयार होईल, असे मत हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मंडळी व्यक्त करीत आहेत. उरी हल्ल्यापासून पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जोरात होत आहे. काहींनी पाक कलावंत असल्याने दिग्दर्शक, निर्माता करण जोहर याचे चित्रपट प्रदर्शित होउ देणार नाही, असे स्पष्ट केले. ‘इम्पा’ संघटनेनेही पाक कलाकारांना काम न देण्याचा निर्णय घेतला आहे. जोहर यांच्या चित्रपटाला प्रदर्शनाला परवानगी मिळण्यासाठी सलमान खान ‘मनसे’ पक्षप्रमुख राज ठाकरे यांना भेटणार असल्याचेही प्रसिद्ध झाले होते.भारतीय जवानाच्या सुटकेसाठी प्रयत्न चुकीने सीमेपलीकडे गेलेल्या आणि पाकिस्तानात पोहचलेल्या त्या भारतीय जवानाच्या सुटकेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी दिली. हा मुद्दा पाकिस्तानपुढे मांडण्यात येईल. मिलिटरी आॅपरेशनच्या महासंचालकांनी ही माहिती हॉटलाईनद्वारे पाकला दिली आहे. पाकिस्तानातील हल्ला आणि या जवानाने चुकून पार केलेली सीमा यांचा काहीही संबंध नाही, चुकीने सीमा ओलांडण्याचे प्रकार दोन्ही बाजुच्या सैनिकांकडून बऱ्याचदा होतात, असेही सैन्य दलाने स्पष्ट केले आहे. चंदू बाबूलाल चव्हाण हा सीमेपलीकडे चुकून गेल्याचे सांगण्यात येत आहे.