शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

क्षेपणास्त्र प्रसारबंदी गटात भारत

By admin | Updated: June 28, 2016 06:02 IST

‘मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम’ (एमटीसीआर) या आंतरराष्ट्रीय गटात भारताला सोमवारी पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश मिळाला. या गटाचा भारत ३५ वा सदस्य आहे.

नवी दिल्ली : व्यापक संहाराची अस्त्रे, क्षेपणास्त्रे व हवेतून जमिनीवर मारा करू शकणारी मानवरहित विमाने यांचा प्रसार रोखण्यासाठीच्या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम’ (एमटीसीआर) या आंतरराष्ट्रीय गटात भारताला सोमवारी पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश मिळाला. या गटाचा भारत ३५ वा सदस्य आहे.संहारक शस्त्रास्त्रे व त्यांचे तंत्रज्ञान यांच्या प्रसारबंदीसाठी स्थापन झालेल्या कोणत्याही बहुराष्ट्रीय संघटनेत भारत सहभागी होण्याची ही पहिली वेळ आहे. अण्वस्त्र प्रसारबंदी रोखण्यासाठी अणुतंत्रज्ञान व त्यासाठीची साधनसामुग्री यांच्या हस्तांतरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन झालेल्या ‘न्यूक्लियर स्लापयर्स ग्रुप’ (एनएसजी) या ४७ देशांच्या संघटनेचे सदस्यत्व, चीनने खोडा घातल्याने भारताला मिळू शकलेले नाही. भारताला आता मिळालेले ‘एमटीसीआर’चे सभासदत्व हे तूर्तास दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखे मानायला हवे.अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केलेली नसल्याने भारताला ‘एनएसजी’चे सदस्यत्व देण्यास चीनने जोरदार विरोध केला व निकष शिथिल करून भारताला प्रवेश द्यायचा असेल, तर पाकिस्तानलाही तोच न्याय लावावा लागेल, असा आग्रह धरला. चीन ‘एमटीसीआर’चा सदस्य नाही. दोन नौदल सैनिकांना अटक झाल्यानंतर पूर्वी इटलीने भारताच्या या गटातील प्रवेशास विरोध केला होता, परंतु ते दोन्ही नाविक स्वदेशी परतल्याने इटलीचा विरोध मावळला. या संघटनेचा सदस्य झाल्याने भारतास इतर देशांकडून प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळू शकेल व त्यासाठी रशियाशी औपचारिक सहकार्य करता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)भारताचा हा प्रवेश आंतरराष्ट्रीय प्रसारबंदीचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास परस्पर फायदेशीर ठरेल. भारत आपल्या सदस्यत्वाला पाठिंबा देणाऱ्या एमटीसीआरच्या अन्य ३४ सदस्य देशांचा आभारी आहे. - प्रवक्ता, परराष्ट्र मंत्रालय