शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

१ आॅक्टोबरपासून भारत ठप्प

By admin | Updated: September 8, 2015 02:45 IST

देशातील टोल वसूल करण्याच्या पद्धतीत अनेक त्रुटी असून, त्याऐवजी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करीत देशातील मालवाहतूकदारांनी १ आॅक्टोबरपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे.

मुंबई : देशातील टोल वसूल करण्याच्या पद्धतीत अनेक त्रुटी असून, त्याऐवजी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करीत देशातील मालवाहतूकदारांनी १ आॅक्टोबरपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. मालवाहतूकदारांची शिखर संघटना असलेल्या आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने तसे निवेदन पंतप्रधान कार्यालयाला दिले आहे.यासंदर्भात वारंवार केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर कोणताही तोडगा निघत नसल्याने संपाचा पवित्रा घ्यावा लागल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष अमृतलाल मदान यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मदान म्हणाले, की सरकारचा कोणत्याही प्रकारचा महसूल बुडवण्याचा संघटनेचा उद्देश नाही. त्यामुळेच सरकारला टोलच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलाहून १० टक्के जास्त रक्कम देण्याची तयारी वाहतूकदारांनी दर्शवली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारला वर्षाच्या शेवटी मिळणारा महसूल संघटना वर्षाआधीच देण्यास तयार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशातून टोलच्या माध्यमातून वर्षाला १४ हजार कोटी रुपये वसूल केले जातात, असा मदान यांचा दावा आहे. मात्र टोलनाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगांमुळे खर्च होणाऱ्या वेळ आणि इंधनामुळे देशाचे ८८ हजार कोटींचे नुकसान होते, असेही सरकारी आकडेवारी सांगते. परिणामी सरकारने दिलेल्या माहितीवरून देशाच्या विकासात टोलनाके मोठा अडसर ठरत असल्याचा आरोप मदान यांनी केला.अवजड वाहनांसह हलक्या चारचाकी वाहनांच्या टोलमधून मिळणारी एकहाती रक्कम वाहतूकदार संघटना भरण्यास तयार आहे. त्यामुळे सर्वच वाहनांची टोलधाडीतून मुक्तता होणार आहे. त्यामुळे सरकारने या पर्यायावर थोडासा विचार केल्यास सर्वच वाहनमालकांचा पैसा व वेळ वाचणार आहे.पैसा वसूल करण्याचा सोपा मार्गकेंद्रीय पातळीवर वाहतूक करणारे वाहतूकदार दरवर्षी केंद्रीय परवाना काढतात. त्यासाठी सरासरी १५ हजार रुपये खर्च होतो. त्यात ५० हजार रुपयांची वाढ करून टोल कर वसूल केल्यास १६ हजार कोटींचा महसूल शासनदरबारी जमा होईल. याशिवाय होणारे नुकसान डिझेलच्या भावात २ रुपये वाढ केल्यावर भरून निघेल, असाही पर्याय संघटनेने सुचवलेला आहे.टोलची पद्धत बदलाएका टोलसाठी गुंतवणूक केलेले ४०० कोटी रुपये दोन ते चार वर्षांत वसूल होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. मात्र २० ते २५ वर्षे टोलमध्ये वाढ करूनही कंत्राटदार टोल वसूल करीत असतात. शिवाय कित्येकवेळा टोलमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलेला आहे. त्यामुळे टोल वसूल करण्याची पद्धत बदलण्याची संघटनेची मागणी आहे...तर कोट्यवधींचे नुकसानवाहतूकदारांच्या संपात लॉरी, ट्रक, टेम्पो, टँकर आणि सर्वच वाहतूक क्षेत्रातील ७५ लाख वाहने सामील होणार आहेत. त्यामुळे दुधापासून एलपीजी गॅसपर्यंतची सर्वच अत्यावश्यक सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. परिणामी देशाचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.