शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातील भारतीयामुळे देशाला ओळख मिळाली - नरेंद्र मोदी

By admin | Updated: January 8, 2015 15:18 IST

जगातील दोनशेहून अधिक देशात भारतीय नागरिकांचे वास्तव्य असून त्यांच्यामुळे भारताला जगाच्या नकाशावर ओळख मिळाली असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'प्रवासी भारतीय संमेलना' दरम्यान केले.

ऑनलाइन लोकमत

गांधीनगर, दि. ८ - जगातील दोनशेहून अधिक देशात भारतीय नागरिकांचे वास्तव्य असून त्यांच्यामुळे भारताला जगाच्या नकाशावर ओळख मिळाली असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'प्रवासी भारतीय संमेलना' दरम्यान केले. तेराव्या प्रवासी भारतीय दिनानिमित्त गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनासाठी मूळचे भारतीय असलेले 'गुयाना'चे राष्ट्रपती डोनाल्ड रामोतार आपल्या पत्नीसह उपस्थित होते. 
' संपूर्ण जग आज भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. भारताचे सामर्थ्य वाढले आहे. यापूर्वी आपले पूर्वज नवनव्या संधीच्या शोधात जगभरात गेले होते. मात्र आता अनिवासी भारतीयांना भारतात अनेक संधी उपलब्ध आहेत. जगाला देण्यासारखे भारताकडे खूप काही आहे,असे मोदी म्हणाले. तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते हे मला माहीत आहे, त्यामुळे जगातील काही देशांना आगमनानंतर व्हिसाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गांधींजींच्या विचारामुळे सर्व जगाला आज प्रेरणा मिळत असल्याचे सांगत मोदींनी राष्ट्रपिता महात्मा गांधींचेही स्मरण केले. यावेळी त्यांनी प्रवासी भारतीयांना 'गंगा सफाई' मोहिमेत योगदान देण्याचेही आवाहन केले. 
मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
- जगातील २०० हून अधिक देशात भारतीयांचे वास्तव्य आहे. त्यांच्या रुपाने संपूर्ण भारतच विदेशात रहात आहे.
- जगभरात जेथे जेथे संधी उपलब्ध होती, तेथे तेथे भारतीय गेले आहेत. मात्र आता नव्या संधीच्या शोधात बाहेर जाण्याची गरज नाही, आता भारतातच तुम्हाला संधी मिळेल.
- १०० वर्षांपूर्वी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले आणि त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. जगभरातील लोकांना त्यांचे विचार प्रेरणादायी वाटतात. मॉरशिअसमध्ये आजही २ ऑक्टोबर रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते.
- आपली संस्कृती, मूल्य आणि संस्कारांमुळे जगभरात भारतीय नावाजले जातात, त्यांचा आदर व प्रशंसा केली जाते.
- जगाला देण्यासाठी भारताकडे खूप काही आहे. 
- प्रवासी भारतीयांना जे वचन देण्यात आले होते ते पूर्ण करण्यात आले. पीईओ कार्ड धारकांना आजीवन व्हिसा देण्याचे वचन पूर्ण केले.
- प्रवासी भारतीयांना आता दर आठवड्याला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावण्याची गरज नाही. 
-  अनेक देशांसाठी व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा सुरू करण्यात आली आहे.