शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

ISIS शी लढा देण्यासाठी भारताने फिलिपिन्सला दिले 5 लाख डॉलर्स

By admin | Updated: July 12, 2017 13:40 IST

भारताने एखाद्या देशाला दहशतवादी संघटनेशी लढण्यासाठी आर्थिक मदत करण्याची ही पहिलीच वेळ आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरियाशी (इसीस) दोन हात करण्यासाठी भारताने फिलिपिन्सला जवळपास पाच लाख डॉलर्स म्हणजे 3.2 कोटीचीं मदत केली आहे. भारताने एखाद्या देशाला दहशतवादी संघटनेशी लढण्यासाठी आर्थिक मदत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. फिलिपिन्समधील दक्षिण भागामधील मारावी शहरात जवळपास दोन महिन्यांपासून इसीसने ठाण मांडला असून कब्जा केला आहे. इसीसच्या ताब्यातून सुटका करुन घेण्यासाठी सुरक्षा जवान प्रयत्न करत आहेत. 
 
आणखी वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींची दहशतवादाविरोधात 10 सूत्रं
दहशतवादाच्या राक्षसाला नष्ट करू
जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला, सात ठार
 
केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि फिलिपिन्सचे परराष्ट्र मंत्री अॅलन पीटर सायटानो यांच्यादरम्यान 6 जुलै रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीनंतरच भारताकडून ही मदत देण्यात आली आहे. फिलिपिन्सची राजधानी मनिला येथील भारतीय दुतावासाकडून स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. "मारावी शहरातील लोकांच्या निधनावर सुषमा स्वराज यांनी शोक व्यक्त केल्याचं", यामध्ये सांगण्यात आलं आहे.  
 
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिलिपिन्समधील लष्कर आणि इसीसच्या दहशतवाद्यांमध्ये 26/11 मुंबई हल्ल्याप्रमाणे संघर्ष चालू आहे. गेल्या सात आठवड्यांपासून हा संघर्ष चालू आहे. या संघर्षात आतापर्यंत 90 हून जास्त जवान शहीद झाले आहेत. तर 380 हून जास्त दहशतवादी आणि अनेक सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी हजारो लोकांना बंदिस्त करुन ठेवलं आहे. 
 
फिलिपिन्सला संकटाशी सामना करण्यासाठी मदत करणा-यांमध्ये भारत सर्वात मोठा देश ठरला आहे. फिलिपिन्सचा नवा मित्र असलेल्या चीनने या संकटाच्या परिस्थितीत दोन कोटींपेक्षा कमी आर्थिक मदत केली आहे. फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी मिंदानाओ प्रांतात मार्शल कायदा लागू केला आहे. गेल्या 60 दिवसांपासून हा कायदा लागू करण्यात आला आहे. तसंच पुढील 15 दिवसांत सर्व दहशवाद्यांचा खात्मा करण्याचा दावाही त्यांनी केला आहे.
 
जी-20 सदस्य देशांनी केला दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचा संकल्प
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतल्या जी-20 शिखर परिषदेत दहशतवादाविरोधात कडक भूमिका मांडली होती. मोदींनी यावेळी दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी 10 मोठ्या योजनांची घोषणा केली होती. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी एक अ‍ॅक्शन प्लानच जगासमोर ठेवला होता.
 
जर्मनीतील हॅम्बर्ग येथे पार पडलेल्या जी-20 संमेलनातील सर्व नेत्यांनी दहशतवादाविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. संमेलनाच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जी-20 नेत्यांनी जगभरातील दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच दहशत आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात एकजूट करण्याची घोषणा केली होती.