शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

भारतानेच ५७ वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, पाकचा कांगावा

By admin | Updated: August 20, 2014 13:03 IST

भारतानेच गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल ५७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे असा कांगावा पाकिस्तानने बुधवारी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २० -  दररोज भारतीय चौक्यांनर गोळीबार करुन शस्त्रसंधींचे उल्लंघन मारणा-या पाकिस्तानने 'भारतानेच गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल ५७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे' असा कांगावा बुधवारी केला आहे. फुटीरवादी नेत्यांशी चर्चा करण्याची जूनी पद्धत असून यात गैर काहीच नाही असे सांगत पाकने जम्मूतील फुटीरवादी नेत्यांसोबतच्या चर्चेची पाठराखण केली आहे. 
जम्मू काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांसोबत पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दूल बसित यांनी मंगळवारी चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी पाकचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन पाकची भूमिका मांडली.  ' दक्षिण आशियात शांतता निर्माण करण्यास पाकिस्तान सरकार कटीबद्ध असून स्वातंत्र्यदिनी मोदींनी सार्क देशांनी सहकार्य करण्याची भूमिका मांडली त्याचे आम्ही स्वागत करतो' असे बसित यांनी सांगितले. भारताशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी पाक नेहमीच प्रयत्नशील असतो. जम्मूतील फुटीरवादी नेत्यांशी चर्चा करण्याची जूनी परंपरा आहे. काश्मिरी जनताच शांतता प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे असे बसित यांनी म्हटले आहे. शस्त्रसंधींच्या उल्लंघनाविषयी विचारले असता बसित यांनी भारतावरच शस्त्रसंधींचे खापर फोडले. भारतानेच तब्बल ५७ वेळा शस्त्रसंधींचे उल्लंघन केले असा कांगावाही त्यांनी केला.