शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

भारताकडे 2600 अणवस्त्रे बनवण्याची क्षमता - पाकिस्तान

By admin | Updated: May 19, 2017 11:43 IST

कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून सणसणीत चपराक मिळालेल्या पाकिस्तानने आता अणवस्त्र कार्यक्रमांवरुन भारतावर आरोप केला आहे.

 ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 19 - कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून सणसणीत चपराक मिळालेल्या पाकिस्तानने आता अणवस्त्र कार्यक्रमांवरुन भारतावर आरोप केला आहे. जगामध्ये भारताचा अणवस्त्र कार्यक्रम वेगाने विकसित होत असून, भारताकडे 2600 अणवस्त्रांची निर्मिती करण्याची क्षमता आहे असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नाफीस झाकारीया म्हणाले. 
 
इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. भारताच्या अणवस्त्र संपन्नतेच्या महत्वकांक्षेमुळे दक्षिण आशियाच्या स्थैर्याला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला नागरी अणूऊर्जा कार्यक्रमातंर्गत अणू इंधन, उपकरणे आणि जे तंत्रज्ञान मिळतेय त्याचा गैरवापर होण्याची भिती पाकिस्तानने व्यक्त केली आहे. भारताला अणू पुरवठादर देश एनएसजी गटाचे कायमस्वरुपी सदस्यत्व हवे आहे त्यावरही पाकिस्तानला आक्षेप आहे. 
 
एलिट गटामध्ये भारताला सदस्यत्व दिल्यामुळे जे धोके निर्माण होऊ शकतात त्याचा जागतिक समुदायाने विचार करावा असे नाफीस झाकारीया म्हणाले. काही दिवसांपूर्वी भारताने अणवस्त्रांचा पहिला वापर न करण्याच्या आपल्या धोरणाचा फेरविचार करण्याचे संकेत दिले होते. पाकिस्तानकडून वापर होऊ शकतो असे वाटले तर, भारतच पहिला अणवस्त्रांचा वापर करेल असे संकेत भारताने दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानने आता अशा स्वरुपाचे विधान केले आहे. 
 
वास्तवात पाकिस्ताननेच अणवस्त्रांच्या निर्मितीवर सर्वाधिक भर दिल्याचे अनेकदा समोर आले आहे.  अमेरिकेतील अनेक संस्थांनी पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाचे अहवाल प्रसिद्ध करुन पाकिस्तानच्या नापाक कृती जगासमोर आणल्या आहेत.