शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडे 2600 अणवस्त्रे बनवण्याची क्षमता - पाकिस्तान

By admin | Updated: May 19, 2017 11:43 IST

कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून सणसणीत चपराक मिळालेल्या पाकिस्तानने आता अणवस्त्र कार्यक्रमांवरुन भारतावर आरोप केला आहे.

 ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 19 - कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून सणसणीत चपराक मिळालेल्या पाकिस्तानने आता अणवस्त्र कार्यक्रमांवरुन भारतावर आरोप केला आहे. जगामध्ये भारताचा अणवस्त्र कार्यक्रम वेगाने विकसित होत असून, भारताकडे 2600 अणवस्त्रांची निर्मिती करण्याची क्षमता आहे असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नाफीस झाकारीया म्हणाले. 
 
इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. भारताच्या अणवस्त्र संपन्नतेच्या महत्वकांक्षेमुळे दक्षिण आशियाच्या स्थैर्याला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला नागरी अणूऊर्जा कार्यक्रमातंर्गत अणू इंधन, उपकरणे आणि जे तंत्रज्ञान मिळतेय त्याचा गैरवापर होण्याची भिती पाकिस्तानने व्यक्त केली आहे. भारताला अणू पुरवठादर देश एनएसजी गटाचे कायमस्वरुपी सदस्यत्व हवे आहे त्यावरही पाकिस्तानला आक्षेप आहे. 
 
एलिट गटामध्ये भारताला सदस्यत्व दिल्यामुळे जे धोके निर्माण होऊ शकतात त्याचा जागतिक समुदायाने विचार करावा असे नाफीस झाकारीया म्हणाले. काही दिवसांपूर्वी भारताने अणवस्त्रांचा पहिला वापर न करण्याच्या आपल्या धोरणाचा फेरविचार करण्याचे संकेत दिले होते. पाकिस्तानकडून वापर होऊ शकतो असे वाटले तर, भारतच पहिला अणवस्त्रांचा वापर करेल असे संकेत भारताने दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानने आता अशा स्वरुपाचे विधान केले आहे. 
 
वास्तवात पाकिस्ताननेच अणवस्त्रांच्या निर्मितीवर सर्वाधिक भर दिल्याचे अनेकदा समोर आले आहे.  अमेरिकेतील अनेक संस्थांनी पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाचे अहवाल प्रसिद्ध करुन पाकिस्तानच्या नापाक कृती जगासमोर आणल्या आहेत.