शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

देशात ५९ वाघ रेडिओ कॉलरधारी!

By admin | Updated: April 27, 2016 02:29 IST

देशातील विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये ५९ वाघांना रेडिओ कॉलर बसविण्यात आले आहे

नवी दिल्ली : देशातील विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये ५९ वाघांना रेडिओ कॉलर बसविण्यात आले आहे आणि कॉलर लावल्यामुळे मिळणारी माहिती त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले.पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की, मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ३५ वाघांना रेडिओ कॉलर बसविण्यात आले आहे तर राजस्थानच्या दोन अभयारण्यात १४ वाघांना हे उपकरण लावण्यात आले आहे. या रेडिओ कॉलरची किंमत ते कुठल्या कामासाठी वापरले जात आहे त्यावर अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तीन ते चार वर्ष चालणाऱ्या बॅटरीवर आधारित व्हीएचएफ रेडिओ कॉलरची किंमत २५ ते ३० हजार रुपयांपर्यत असते. हा कॉलर ठराविक क्षेत्रात वन्यजीवांवर नजर ठेवण्याच्या कामात येतो. जीपीएस, अ‍ॅक्टिव्हिटी सेन्सर, मोर्टेलिटी सेन्सर, व्हीएचएफ, यूएचएफ, आॅटोमॅटिक ड्रॉप आॅफसारख्या आधुनिक रेडिओ कॉलरची किंमत तीन ते साडेचार लाख एवढी असते. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणने (एनटीसीए) रेडिओ कॉलरमुळे वाघांना असलेल्या संभाव्य धोक्याचे कुठलेही मूल्यांकन केले नसल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.पेंचमध्ये एका वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला असल्याची माहिती देताना ते म्हणाले की, पन्ना आणि सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील सर्व वाघांना कॉलर लावण्यात आले असून ते मजेत आहेत. रेडिओ कॉलरच्या माध्यमाने वाघांबद्दल गोळा केलेली माहिती त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रदीर्घ काळ महत्त्वाची असते.