शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारताला कोणत्याही देशाचा भूभाग नकोय

By admin | Updated: October 3, 2016 04:13 IST

भारताने कधी कुठल्या देशावर हल्ला केला नाही आणि कोणत्याही देशाचा भूभाग आम्हाला नकोय.

नवी दिल्ली : भारताने कधी कुठल्या देशावर हल्ला केला नाही आणि कोणत्याही देशाचा भूभाग आम्हाला नकोय. उलट जागतिक महायुद्धात आमच्या दीड लाख जवानांनी दुसऱ्यांसाठी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवत असताना मोदी यांनी हे विधान केले आहे, हे विशेष. प्रवासी भारत केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मोदी म्हणाले की, विदेशातील भारतीय सत्ता मिळविण्यात किंवा राजकारणात सक्रीय होण्यात रस दाखवित नाही. याउलट सामाजिक सद्भावनेतून ते अन्य समुदायासोबत एकत्र राहतात. महायुद्धात आमच्या अनेक सैनिकांनी प्राणाहुती दिली. पण, देशाने या बलिदानाची जगाला कधी जाणीव करुन दिली नाही. आपण जेव्हा विदेशात जातो तेव्हा या सैनिकांच्या स्मारकाला आवर्जुन भेट देतो असेही ते म्हणाले. ब्रेन ड्रेन (सुशिक्षित लोकांचे स्थलांतर) बाबत खूप काही बोलले गेले आहे. जर भारतीय समुदायाच्या मजबुतीला योग्य वळण दिले तर आम्ही याचे ‘ब्रेन गेन’मध्ये रुपांतर करु शकतो. नेपाळमध्ये भूकंपानंतर केलेली मदत आणि यमनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे कौतुक केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>आता मोदींची छाती ५६नव्हे १०० इंचांची : चौहानभोपाळ : पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाई (सर्जिकल आॅपरेशन) घडवून आणल्याबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ५६ इंचांची छाती आता फुलून १०० इंचांची झाली आहे, अशा शब्दांत त्यांचे कौतूक केले. आता ही छाती ५६ इंचांची नव्हे तर १०० इंचांची बनली आहे, असे चौहान यांनी एमएसएमई अधिवेशनाच्या उद््घाटन कार्यक्रमात येथे म्हटले. आमच्या विकासाचा वेग हा चीनपेक्षा जास्त आहे. भारत किती सामर्थ्यशाली आहे हे तुम्ही नुकतेच बघितले आहे, असे ते म्हणाले. आमच्या लष्कराचे अभिनंदन, नरेंद्र मोदी-जी यांचे अभिनंदन. आता छाती ५६ इंचांची नव्हे तर १०० इंचांची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.>४०० रेल्वे कर्मचाऱ्यांशीमोदी थेट संवाद साधणारपंतप्रधान मोदी रेल्वेच्या ४०० कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणार आहेत तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे २० हजार जणांशी संवाद साधतील. रेल्वे हे देशाचे प्रमुख वाहतुकीचे साधन असून बदलत्या काळासोबत प्रवाशांच्या त्याकडून अपेक्षाही बदलल्या आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी मोदी या संवादातून अभिनव कल्पना घेतील.