शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

भारताला कोणत्याही देशाचा भूभाग नकोय

By admin | Updated: October 3, 2016 04:13 IST

भारताने कधी कुठल्या देशावर हल्ला केला नाही आणि कोणत्याही देशाचा भूभाग आम्हाला नकोय.

नवी दिल्ली : भारताने कधी कुठल्या देशावर हल्ला केला नाही आणि कोणत्याही देशाचा भूभाग आम्हाला नकोय. उलट जागतिक महायुद्धात आमच्या दीड लाख जवानांनी दुसऱ्यांसाठी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. काश्मीरच्या मुद्यावर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवत असताना मोदी यांनी हे विधान केले आहे, हे विशेष. प्रवासी भारत केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मोदी म्हणाले की, विदेशातील भारतीय सत्ता मिळविण्यात किंवा राजकारणात सक्रीय होण्यात रस दाखवित नाही. याउलट सामाजिक सद्भावनेतून ते अन्य समुदायासोबत एकत्र राहतात. महायुद्धात आमच्या अनेक सैनिकांनी प्राणाहुती दिली. पण, देशाने या बलिदानाची जगाला कधी जाणीव करुन दिली नाही. आपण जेव्हा विदेशात जातो तेव्हा या सैनिकांच्या स्मारकाला आवर्जुन भेट देतो असेही ते म्हणाले. ब्रेन ड्रेन (सुशिक्षित लोकांचे स्थलांतर) बाबत खूप काही बोलले गेले आहे. जर भारतीय समुदायाच्या मजबुतीला योग्य वळण दिले तर आम्ही याचे ‘ब्रेन गेन’मध्ये रुपांतर करु शकतो. नेपाळमध्ये भूकंपानंतर केलेली मदत आणि यमनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे कौतुक केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>आता मोदींची छाती ५६नव्हे १०० इंचांची : चौहानभोपाळ : पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाई (सर्जिकल आॅपरेशन) घडवून आणल्याबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ५६ इंचांची छाती आता फुलून १०० इंचांची झाली आहे, अशा शब्दांत त्यांचे कौतूक केले. आता ही छाती ५६ इंचांची नव्हे तर १०० इंचांची बनली आहे, असे चौहान यांनी एमएसएमई अधिवेशनाच्या उद््घाटन कार्यक्रमात येथे म्हटले. आमच्या विकासाचा वेग हा चीनपेक्षा जास्त आहे. भारत किती सामर्थ्यशाली आहे हे तुम्ही नुकतेच बघितले आहे, असे ते म्हणाले. आमच्या लष्कराचे अभिनंदन, नरेंद्र मोदी-जी यांचे अभिनंदन. आता छाती ५६ इंचांची नव्हे तर १०० इंचांची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.>४०० रेल्वे कर्मचाऱ्यांशीमोदी थेट संवाद साधणारपंतप्रधान मोदी रेल्वेच्या ४०० कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणार आहेत तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे २० हजार जणांशी संवाद साधतील. रेल्वे हे देशाचे प्रमुख वाहतुकीचे साधन असून बदलत्या काळासोबत प्रवाशांच्या त्याकडून अपेक्षाही बदलल्या आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी मोदी या संवादातून अभिनव कल्पना घेतील.