शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
5
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
6
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
7
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
8
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
9
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
11
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
12
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
13
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
14
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
15
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
16
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
17
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
18
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
19
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
20
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत

‘भारत-चीनला मतभेद कमी करावे लागतील’

By admin | Updated: June 29, 2014 02:00 IST

भारत आणि चीनने ऐतिहासिक पंचशील तत्त्वांचे पालन करून आपसातील मतभेद कमी करणो आवश्यक आहे. द्विपक्षीय संबंधांमध्ये मतभेदांपेक्षा परस्परहिताला अधिक महत्त्व आहे,

बीजिंग : भारत आणि चीनने ऐतिहासिक पंचशील तत्त्वांचे पालन करून आपसातील मतभेद कमी करणो आवश्यक आहे. द्विपक्षीय संबंधांमध्ये मतभेदांपेक्षा परस्परहिताला अधिक महत्त्व आहे, असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले. पंचशील कराराला 6क् वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथे आयोजित एका विशेष समारंभाला शनिवारी ते संबोधित करत होते. यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष थेन सेन यांची उपस्थिती होती. 
 पाच दिवसांच्या चीन दौ:यावर आलेले उपराष्ट्रपती अन्सारी पुढे म्हणाले, भारत, चीन आणि म्यानमार यांच्यातील संबंध हे दीर्घकालीन आणि भौगोलिक आहेत. विकासाच्या निरनिराळ्या टप्प्यावर आपण असलो तरी आपणाला एकमेकांच्या राष्ट्रीय अनुभवापासून खूप काही शिकावे लागेल. यासाठी पंचशील हा एक उत्तम मार्ग आहे. 
‘जागतिक कृतीसाठी आम्हाला एका नव्या मॉडेलची गरज आहे. आपले नशीब हे एकमेकांत गुंतलेले आहे. उभय देशांतील समाजाच्या सहअस्तित्वासाठी आव्हाने व संधी यांचा एक आराखडा तयार करावा लागणार आहे. यासाठी पंचशील  एका मध्यस्थाप्रमाणो भूमिका बजावेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले. (वृत्तसंस्था)
परस्पर सहकार्य, समन्वयित कृती, विकासविषयक अनुभवाची देवाण-घेवाण आणि उभय देशांतील आव्हानांचा निपटारा करण्यासाठी पंचशील तत्त्वांची मोठी मदत होईल,’ असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले. अन्सारी यांनी यावेळी प्राचीन नागरीकरण आणि शेजारी यापासून ते भारत आणि चीन हे एकमेकांचे धोरणात्मक भागीदार झाल्याच्या वास्तवाकडे लक्ष वेधले.
राष्ट्रप्रमुखांनी दिल्या शुभेच्छा
पंचशील कराराला 6क् वर्षे पुर्ण झाल्यानिमित्ताने भारत, चीन आणि म्यानमारच्या राष्ट्राप्रमुखांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या. पंचशील करार आपसातील संबंध दृढ करण्यासाठीच मोलाचा नसून अन्य देशांसोबतच्या व्यवहारासाठीही दिशादर्शक असेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. 2क्14 हे ‘भारत-चीन मैत्री आणि देवाण-घेवाण वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे.  (वृत्तसंस्था)
 
4एकमेकांची भौगोलिक अखंडता व सार्वभौमत्व यांचा आदर करणो
4भूप्रदेशात घुसखोरी न करणो
4अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप न करणो
4समानता आणि परस्परांचे हित
4शांततापूर्ण सहअस्तित्व.
भारत, चीन व म्यानमार यांच्यात 1954 मध्ये करार झाला होता. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व त्यांचे चिनी समपदस्थ चाऊ एन लाय यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. 
हा करार म्यानमारनेही स्वीकारला.