शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

India China FaceOff: चीन पुन्हा कुटील चाल खेळला, भारतालाच पँगाँग त्सोमधून माघारीचा सल्ला दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 11:13 IST

भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावर झालेली पाचव्या टप्प्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. चीनने केलेल्या मागणीनुसार मोल्डो येथे झालेली आणि १० तास चाललेली ही चर्चा कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाण्यापूर्वी संपली.

ठळक मुद्देभारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यातील तणाव निवळला असला तरी पँगाँग त्सो परिसरात निर्माण झालेला तणाव कायमचीनने या भागातील फिंगर ४ येथून भारतास मागे हटण्यास सांगितले भारतीय जवान हे फिंगर ८ पर्यंत पेट्रोलिंग करतात. तसेच भारत आणि चीनमधील या भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही फिंगर ८ मध्ये आहे असे भारताकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे

नवी दिल्ली - लडाखमध्ये घुसखोरीच्या मुद्यावरून भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव कायम आहे. एकीकडे दोन्ही देशामधील वातावरण शांत असले तरी चीनकडून सातत्याने नवनव्या चाली खेळल्या जात आहेत. दरम्यान, भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावर झालेली पाचव्या टप्प्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. चीनने केलेल्या मागणीनुसार मोल्डो येथे झालेली आणि १० तास चाललेली ही चर्चा कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाण्यापूर्वी संपली. या बैठकीमध्ये चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून माघारीबाबत चकार शब्द न काढता भारतालाच पँगाँग त्सो येथून माघार घेण्यास सांगितले, दरम्यान, भारताने चीनचा हा प्रस्ताव स्पष्टपणे धुडकावून लावला आहे.भारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यातील तणाव निवळला असला तरी पँगाँग त्सो परिसरात निर्माण झालेला तणाव कायम आहे. चीनने या भागातील फिंगर ४ येथून भारतास मागे हटण्यास सांगितले आहे. मात्र भारतीय जवान हे फिंगर ८ पर्यंत पेट्रोलिंग करतात. तसेच भारत आणि चीनमधील या भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही फिंगर ८ मध्ये आहे असे भारताकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे.पँगाँग त्सो परिसरात फिंगर ४ च्या अलीकडे भारताच्या नियंत्रणाखालील भाग आहे. मात्र मे महिन्यामध्ये चिनी सैन्य हे फिंगर चार पर्यंत आले होते. दरम्यान, चर्चेनंतर चिनी सैन्य फिंगर पाच पर्यंत माघारी गेले. पण चिनी सैन्य भारतीय लष्कराला फिंगर ८ पर्यंत पेट्रोलिंग करण्यास मनाई करत आहे.दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखालील गटाने या प्रस्तावाचा अभ्यास केल्यानंतर हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यानंतर हॉटलाइनवरून हा प्रस्ताव फेटाळत असल्याचे चीनला सांगण्यात आले.रविवारी झालेल्या चर्चेतही चीनने पँगाँस त्सोमधून माघार घेण्यास नकार दिला होता. तर भारताने एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चीनने माघार घेण्याची आणि एप्रिलमध्ये एलएसीवर असलेली यथास्थिती कायम करण्याची अट घातली होती. दरम्यान, हॉट स्प्रिंगमधील पेट्रोलिंग पॉईंट १७ आणि १७ ए येथून चिनी सैन्य अद्याप मागे सरलेले नाही. तसेच डिसइन्गेजमेंट प्रक्रियेचे पालन करत नाही आहे.दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने आपल्या संकेत स्थळावर एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज अपलोड केला आहे. त्यामध्ये मे महिन्यापासून चीन एलएसीवर आक्रमकता वाढवत आहे. गलवान खोरे, पँगाँग त्सो, गोगरा हॉट स्प्रिंगसारख्या क्षेत्रात चीनची आक्रमकता दिवसेंदिवस वाढत आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndiaभारतchinaचीन