शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

...म्हणून 100% मेड इन इंडिया मोबाईल सध्या अशक्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:10 IST

भारतीय भागीदारीला दूर करून चिनी कंपन्यांचा बाजारावर कब्जा

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनशी झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतात चिनी उत्पादनांना विरोध वाढला आहे. सोशल मीडियातून स्वदेशीचा स्वीकार करण्यावर भर दिला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे.मेक इन इंडियाने फायदाहा बदल सरकारच्या कर धोरणामुळे झाला. चीनमधून तयार फोनची आयात केल्यावर १२.५ टक्के आयात शुल्क लावले जायचे. सुटे भाग आयात करून एसईजेमध्ये फोन तयार केल्यावर फक्त एक टक्का कर द्यावा लागायचा. याच कारणामुळे शाओमी, विवो आणि ओप्पोसारखे दिग्गज चिनी ब्रँडस्देखील आपले फोन मेक इन इंडियांतर्गत भारतात तयार करीत आहेत. प्रोसेसर, डिस्प्ले, रॅम आणि मदरबोर्ड व दुसरे सुटे भाग चीनकडूनच आयात केले जात आहेत.गेल्या काही वर्षांत स्थितीत सुधारणा झाली आहे. परंतु पूर्णपणे स्वदेशी स्मार्टफोन आणि टीव्हीसारखी इलेक्ट्रॉनिक उत्पादने अजून फार दूर आहेत. अमेरिकन आयफोन असो की कोरियन सॅमसंग किंवा भारतीय ब्रँडचा मायक्रोमॅक्स आणि लावा भारतात बाजारात विकला जाणारा कोणताही फोन पूर्णपणे मेड इन इंडिया असल्याचा दावा करू शकत नाही. वस्तुस्थिती अशी की, मेक इन इंडियाच्या ब्रँडिंगसोबत बाजारात असलेल्या बड्या ब्रँडचे फोन चीनमधून आयात केलेल्या सुट्या भागांतूनच बनविले जात आहेत. आज शाओमी, ओप्पो, रियलमी, वनप्लस, विवो, हवाई, लेनेवो, मोटोरोला, टेक्नो आणि इन्फिनिक्ससारख्या चिनी ब्रँडस्ने आज भारतीय बाजारातील 72% व्यवसाय बळकावला आहे.चिनी कंपन्यांची घुसखोरी2013 नंतर अनेक चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारात असलेल्या मायक्रोमॅक्स, लावा, इंटेक्ससारख्या भारतीय ब्रँडमधील हिस्सेदारीवर कब्जा केला आहे. त्या आधीपर्यंत त्या चीनहून सुटे भाग मागवून भारतात फोन तयार करायच्या किंवा चीनमधून तयार फोन आयात करून आपल्या ब्रँडसोबत देशी बाजारात विकत होत्या. परंतु २०१३ नंतर भारतीय ब्रँडसाठी फोन बनविणे बंद करून चिनी कंपन्या भारतात दाखल झाल्या. याचे सगळ्यात मोठे उदाहरणमायक्रोमॅक्स आहे.2014 मध्ये हा भारतीय ब्रँड देशी बाजारातील १८ टक्के मागणी चीनची उपकरणे विकून पूर्ण करीत होता. परंतु आज त्याची हिस्सेदारी एक टक्का आहे. त्याच्यासाठी उपकरणे बनविणाºया टॉपवाईजने तिच्याशी संबंध तोडून कोमियो नावाने भारतात आपला ब्रँड सादर केला.2014 मध्ये भारतात फक्त १९ हजार कोटी रुपयांचे फोन तयार केले जात होते. परंतु मेक इन इंडियांतर्गत येत्या दोन वर्षांत ही उलाढाल ९० हजार कोटी रुपयांपर्यंत गेली होती.

रोजगाराची मोठी संधीभारतात फोनची जुळणी करण्यातून मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होतात. चिनी ब्रँडस् रियलमीने नुकताच दावा केला की, आम्ही दहा हजार लोकांना रोजगार देऊ आणि 50 टक्के सुट्या भागांचे उत्पादनही भारतात करू. शाओमीनेदेखील तिच्या असेम्ब्ली प्लँटमध्ये ९० टक्के महिलांना रोजगार देऊ असे म्हटले. शाओमी आणि अ‍ॅप्पलसाठी फोन बनविणाऱ्या फॉक्सकॉनच्या असेम्ब्ली प्लँटमध्ये हजारोंच्या संख्येने लोकांना रोजगार मिळाला आहे. सॅमसंगनेदेखील नोएडात आपला सगळ्यात मोठा मोबाईल कारखाना सुरू करून हजारो लोकांना रोजगार दिला आहे.

टॅग्स :chinaचीनMobileमोबाइल