शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

...म्हणून 100% मेड इन इंडिया मोबाईल सध्या अशक्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:10 IST

भारतीय भागीदारीला दूर करून चिनी कंपन्यांचा बाजारावर कब्जा

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनशी झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतात चिनी उत्पादनांना विरोध वाढला आहे. सोशल मीडियातून स्वदेशीचा स्वीकार करण्यावर भर दिला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे.मेक इन इंडियाने फायदाहा बदल सरकारच्या कर धोरणामुळे झाला. चीनमधून तयार फोनची आयात केल्यावर १२.५ टक्के आयात शुल्क लावले जायचे. सुटे भाग आयात करून एसईजेमध्ये फोन तयार केल्यावर फक्त एक टक्का कर द्यावा लागायचा. याच कारणामुळे शाओमी, विवो आणि ओप्पोसारखे दिग्गज चिनी ब्रँडस्देखील आपले फोन मेक इन इंडियांतर्गत भारतात तयार करीत आहेत. प्रोसेसर, डिस्प्ले, रॅम आणि मदरबोर्ड व दुसरे सुटे भाग चीनकडूनच आयात केले जात आहेत.गेल्या काही वर्षांत स्थितीत सुधारणा झाली आहे. परंतु पूर्णपणे स्वदेशी स्मार्टफोन आणि टीव्हीसारखी इलेक्ट्रॉनिक उत्पादने अजून फार दूर आहेत. अमेरिकन आयफोन असो की कोरियन सॅमसंग किंवा भारतीय ब्रँडचा मायक्रोमॅक्स आणि लावा भारतात बाजारात विकला जाणारा कोणताही फोन पूर्णपणे मेड इन इंडिया असल्याचा दावा करू शकत नाही. वस्तुस्थिती अशी की, मेक इन इंडियाच्या ब्रँडिंगसोबत बाजारात असलेल्या बड्या ब्रँडचे फोन चीनमधून आयात केलेल्या सुट्या भागांतूनच बनविले जात आहेत. आज शाओमी, ओप्पो, रियलमी, वनप्लस, विवो, हवाई, लेनेवो, मोटोरोला, टेक्नो आणि इन्फिनिक्ससारख्या चिनी ब्रँडस्ने आज भारतीय बाजारातील 72% व्यवसाय बळकावला आहे.चिनी कंपन्यांची घुसखोरी2013 नंतर अनेक चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारात असलेल्या मायक्रोमॅक्स, लावा, इंटेक्ससारख्या भारतीय ब्रँडमधील हिस्सेदारीवर कब्जा केला आहे. त्या आधीपर्यंत त्या चीनहून सुटे भाग मागवून भारतात फोन तयार करायच्या किंवा चीनमधून तयार फोन आयात करून आपल्या ब्रँडसोबत देशी बाजारात विकत होत्या. परंतु २०१३ नंतर भारतीय ब्रँडसाठी फोन बनविणे बंद करून चिनी कंपन्या भारतात दाखल झाल्या. याचे सगळ्यात मोठे उदाहरणमायक्रोमॅक्स आहे.2014 मध्ये हा भारतीय ब्रँड देशी बाजारातील १८ टक्के मागणी चीनची उपकरणे विकून पूर्ण करीत होता. परंतु आज त्याची हिस्सेदारी एक टक्का आहे. त्याच्यासाठी उपकरणे बनविणाºया टॉपवाईजने तिच्याशी संबंध तोडून कोमियो नावाने भारतात आपला ब्रँड सादर केला.2014 मध्ये भारतात फक्त १९ हजार कोटी रुपयांचे फोन तयार केले जात होते. परंतु मेक इन इंडियांतर्गत येत्या दोन वर्षांत ही उलाढाल ९० हजार कोटी रुपयांपर्यंत गेली होती.

रोजगाराची मोठी संधीभारतात फोनची जुळणी करण्यातून मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होतात. चिनी ब्रँडस् रियलमीने नुकताच दावा केला की, आम्ही दहा हजार लोकांना रोजगार देऊ आणि 50 टक्के सुट्या भागांचे उत्पादनही भारतात करू. शाओमीनेदेखील तिच्या असेम्ब्ली प्लँटमध्ये ९० टक्के महिलांना रोजगार देऊ असे म्हटले. शाओमी आणि अ‍ॅप्पलसाठी फोन बनविणाऱ्या फॉक्सकॉनच्या असेम्ब्ली प्लँटमध्ये हजारोंच्या संख्येने लोकांना रोजगार मिळाला आहे. सॅमसंगनेदेखील नोएडात आपला सगळ्यात मोठा मोबाईल कारखाना सुरू करून हजारो लोकांना रोजगार दिला आहे.

टॅग्स :chinaचीनMobileमोबाइल