शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून 100% मेड इन इंडिया मोबाईल सध्या अशक्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:10 IST

भारतीय भागीदारीला दूर करून चिनी कंपन्यांचा बाजारावर कब्जा

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनशी झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतात चिनी उत्पादनांना विरोध वाढला आहे. सोशल मीडियातून स्वदेशीचा स्वीकार करण्यावर भर दिला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे.मेक इन इंडियाने फायदाहा बदल सरकारच्या कर धोरणामुळे झाला. चीनमधून तयार फोनची आयात केल्यावर १२.५ टक्के आयात शुल्क लावले जायचे. सुटे भाग आयात करून एसईजेमध्ये फोन तयार केल्यावर फक्त एक टक्का कर द्यावा लागायचा. याच कारणामुळे शाओमी, विवो आणि ओप्पोसारखे दिग्गज चिनी ब्रँडस्देखील आपले फोन मेक इन इंडियांतर्गत भारतात तयार करीत आहेत. प्रोसेसर, डिस्प्ले, रॅम आणि मदरबोर्ड व दुसरे सुटे भाग चीनकडूनच आयात केले जात आहेत.गेल्या काही वर्षांत स्थितीत सुधारणा झाली आहे. परंतु पूर्णपणे स्वदेशी स्मार्टफोन आणि टीव्हीसारखी इलेक्ट्रॉनिक उत्पादने अजून फार दूर आहेत. अमेरिकन आयफोन असो की कोरियन सॅमसंग किंवा भारतीय ब्रँडचा मायक्रोमॅक्स आणि लावा भारतात बाजारात विकला जाणारा कोणताही फोन पूर्णपणे मेड इन इंडिया असल्याचा दावा करू शकत नाही. वस्तुस्थिती अशी की, मेक इन इंडियाच्या ब्रँडिंगसोबत बाजारात असलेल्या बड्या ब्रँडचे फोन चीनमधून आयात केलेल्या सुट्या भागांतूनच बनविले जात आहेत. आज शाओमी, ओप्पो, रियलमी, वनप्लस, विवो, हवाई, लेनेवो, मोटोरोला, टेक्नो आणि इन्फिनिक्ससारख्या चिनी ब्रँडस्ने आज भारतीय बाजारातील 72% व्यवसाय बळकावला आहे.चिनी कंपन्यांची घुसखोरी2013 नंतर अनेक चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारात असलेल्या मायक्रोमॅक्स, लावा, इंटेक्ससारख्या भारतीय ब्रँडमधील हिस्सेदारीवर कब्जा केला आहे. त्या आधीपर्यंत त्या चीनहून सुटे भाग मागवून भारतात फोन तयार करायच्या किंवा चीनमधून तयार फोन आयात करून आपल्या ब्रँडसोबत देशी बाजारात विकत होत्या. परंतु २०१३ नंतर भारतीय ब्रँडसाठी फोन बनविणे बंद करून चिनी कंपन्या भारतात दाखल झाल्या. याचे सगळ्यात मोठे उदाहरणमायक्रोमॅक्स आहे.2014 मध्ये हा भारतीय ब्रँड देशी बाजारातील १८ टक्के मागणी चीनची उपकरणे विकून पूर्ण करीत होता. परंतु आज त्याची हिस्सेदारी एक टक्का आहे. त्याच्यासाठी उपकरणे बनविणाºया टॉपवाईजने तिच्याशी संबंध तोडून कोमियो नावाने भारतात आपला ब्रँड सादर केला.2014 मध्ये भारतात फक्त १९ हजार कोटी रुपयांचे फोन तयार केले जात होते. परंतु मेक इन इंडियांतर्गत येत्या दोन वर्षांत ही उलाढाल ९० हजार कोटी रुपयांपर्यंत गेली होती.

रोजगाराची मोठी संधीभारतात फोनची जुळणी करण्यातून मोठ्या संख्येने रोजगार निर्माण होतात. चिनी ब्रँडस् रियलमीने नुकताच दावा केला की, आम्ही दहा हजार लोकांना रोजगार देऊ आणि 50 टक्के सुट्या भागांचे उत्पादनही भारतात करू. शाओमीनेदेखील तिच्या असेम्ब्ली प्लँटमध्ये ९० टक्के महिलांना रोजगार देऊ असे म्हटले. शाओमी आणि अ‍ॅप्पलसाठी फोन बनविणाऱ्या फॉक्सकॉनच्या असेम्ब्ली प्लँटमध्ये हजारोंच्या संख्येने लोकांना रोजगार मिळाला आहे. सॅमसंगनेदेखील नोएडात आपला सगळ्यात मोठा मोबाईल कारखाना सुरू करून हजारो लोकांना रोजगार दिला आहे.

टॅग्स :chinaचीनMobileमोबाइल