शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

भारत-चीन करू शकतात मानवतेच्या इतिहासाचे पुनर्लेखन

By admin | Updated: September 17, 2014 08:34 IST

भारत आणि चीन मानवतेच्या एतिहासाचे पुनर्लेखन करू शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चीन मानवतेच्या इतिहासाचे पुनर्लेखन करू शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चीनचे राष्ट्रपती शी चिनपिंग यांच्या भारत भेटीच्या एक दिवसआधी मोदी यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. 
भारत आणि चीनच्या संबंधांना साध्या गणतीय पद्धतीने समजले जाऊ शकत नाही. कारण त्यांच्यामध्ये एक अनोखे गुणधर्म आहेत. दोघे मिळून संपूर्ण मानवजातीचे भविष्य उज्ज्वल करू शकतात, असे मोदी म्हणाले. ते चीनच्या पत्रकारांशी बोलत होते. 
पंतप्रधान कार्यालयाने काढलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार पंतप्रधानांनी दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध वाढविण्याबद्दल निवेदन केले आहे. त्यात ते म्हणतात, प्रत्येक इंच पुढे सरकत असताना आम्ही मानवतेच्या एतिहासाचे पुनर्लेखन करू शकतो आणि आमचे पुढे पडलेले प्रत्येक पाऊल पृथ्वीला चांगले बनविण्यात मोठे योगदान ठरू शकतो.
भारत आणि चीन एवढे पुढे जातील की, त्यामुळे केवळ आम्ही दोन देशच पुढे जाणार नाही तर संपूर्ण आशिया आणि मानवजात प्रगती आणि सौहार्दतेच्या दिशेने पुढे जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
दोन्ही देशातील लोकसंख्येबद्दल बोलताना ते म्हणाले, भारत आणि चीनला काही फायदा होणो म्हणजे जगातील सुमारे 35 टक्के लोकसंख्येला लाभ होणे आहे. अशाच प्रकारे भारत आणि चीनचे संबंध मजबूत झाल्यास जगातील 35 टक्के नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन येईल.(वृत्तसंस्था)