शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

भारतातल्या 'या' राज्यात भुताच्या भीतीने अख्खं गाव झालं रिकामं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 1:32 PM

भूत नावाचा प्रकार अस्तित्वात नाहीय. तरीही गावी गेल्यावर भुतांच्या गोष्टी मोठया चवीने चघळल्या जातात. भारतातल्या काही गावखेडयांमध्ये भुताची दहशत आजही कायम आहे.

हैदराबाद - भूत नावाचा प्रकार अस्तित्वात नाहीय. तरीही गावी गेल्यावर भुतांच्या गोष्टी मोठया चवीने चघळल्या जातात. भारतातल्या काही गावखेडयांमध्ये भुताची दहशत आजही कायम आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार तेलंगणच्या निर्मल जिल्ह्यात कासीगुडा हे अख्ख गाव भूताच्या दहशतीने रिकामी झालं आहे. रात्रीच्या सुमारास एका महिलेचे भूत गावात भटकते असा इथल्या गावक-यांचा समज झाला आहे. या महिला भूताच्या दहशतीने संपूर्ण गाव ओस पडले आहे. 

हे भूत फक्त पुरुषांना टार्गेट करते असा इथल्या गावक-यांचा दावा आहे. या गावचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कासीगुडा गावात एकूण 60 कुटुंबे राहतात. दगड फोडणे हा या गावच्या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. गावकरी सुरक्षित ठिकाणाच्या शोधात घर सोडून गेल्याने संपूर्ण गावात सन्नाटा पसरलेला दिसेल. 

गावातील बहुतांश घरांना टाळी लागलेली असून कोणाचीही घरी परतण्याची हिम्मत नाही. जे गावकरी अजूनही गावात राहतायत ते अंधार पडण्यापूर्वी घरी परततात. सूर्य उगवण्यापूर्वी कोणीही घराच्या बाहेर पडत नाही. तेलंगणमधल्या अनेक गावांमध्ये भुतांची दहशत आहे पण प्रथमच गावकरी मोठया संख्येने गाव सोडून गेल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.