शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

बिक्स बैठकीत भारताने पाकिस्तानला एकाकी पाडले : चिनी मीडिया

By admin | Updated: October 19, 2016 16:14 IST

नुकत्याच गोवा येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेच्या मंचाचा वापर भारताने पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी केल्याचा आरोप चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी केला आहे.

 

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि, 19 -  नुकत्याच गोवा येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेच्या मंचाचा वापर भारताने पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी केल्याचा आरोप चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी केला आहे. तसेच या अधिवेशनामधून भारताने एक जबाबदार देश अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करून एनएसजी सदस्यत्व आणि  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी दावेदारी भक्कम केल्याचेही चिनमधील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. 
उरी हल्ला आणि  सर्जिकल स्ट्राइकमुळे  भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने भू-रणनीतिक स्वार्थ साधण्यासाठी ब्रिम्सटेकला ब्रिक्सशी जोडले. तसेच या संमेलनास पाकिस्तान वगळता उपखंडातील सर्व देशांना निमंत्रित करून उपखंडामध्ये पाकिस्तानला एकाकी पाडले आहे, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पाडण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. दरम्यान, चिनी मीडियाने भारताचे प्रयत्न यशस्वी ठरल्याचे मान्य करणे महत्त्वपूर्ण आहे. 
भारतासाठी पाकिस्तानचा समावेश असलेल्या सार्कपेक्षा ब्रिम्सटेक अधिक फायदेशीर  आहे. कारण पाकिस्तान सदस्य नसलेल्या ब्रिम्सटेकमध्ये वर्चस्व गाजवणे भारतासाठी अधिक सोपे आहे, असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. 
ब्रिक्स संमेलनामध्येही पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी केलेल्या भाषणात पाकिस्तानचा दहशतवादाची जन्मभूमी असा उल्लेख केला होता. तसेच परिषदेच्या घोषणापत्रात ब्रिक्स राष्ट्रांनी दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली होती. पण  पण चीनच्या विरोधामुळे पाकिस्तानचा दहशतवादी राष्ट्र असा उल्लेख करण्यात आला नव्हता.