शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

भारताच्या प्रत्युत्तरात पाकमध्ये ८ जणांचा मृत्यू

By admin | Updated: August 26, 2014 10:29 IST

शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय सैन्याच्या छावण्या आणि सीमा रेषेवरील गावांवर हल्ला गोळीबार करणे पाकिस्तानलाच महागात पडले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ - शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय सैन्याच्या छावण्या आणि सीमा रेषेवरील गावांवर हल्ला व गोळीबार करणे पाकिस्तानलाच महागात पडले आहे. पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात गेल्या दहा दिवसांत पाकिस्तान सैन्यातील जवानांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १२ जण जखमी झाले आहेत. 
जम्मू काश्मीरमधील भारत - पाक सीमा रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) आहे. पाकिस्तानी रेंजर्सच्या तुलनेत बीएसएफचे जवान अधिक सक्षम असून बीएसएफच्या जवानांकडील शस्त्रही पाकच्या तुलनेने चांगली आहेत. त्यामुळे बीएसएफने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचेच जास्त नुकसान होते अशी माहिती बीएसएफच्या एका अधिका-याने दिली आहे. गेल्यावर्षी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे १३ जवान शहीद झाले होते. यावर्षी आत्तापर्यंत भारताचा एक जवान शहीद झाला आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तर यंदा भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानमधील तीन जवान, तीन नागरिक आणि दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि बीएसएफचे महासंचालक डी..के. पाठक यांची नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत गृहमंत्र्यांनी बीएसएफला पाठिंबा देत पाकला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे करताना सीमा रेषेवरील गावांमध्ये राहणा-या नागरिकांची काळजी घ्यावी अशी सूचनाही देण्यात आली आहे. 'पाक सैन्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देत असलो तरी त्यांच्या गावांमधील नागरिकांना आम्ही लक्ष करत नाही' असेही अधिका-याने सांगितले. तर भारतीय हद्दीतील गावांमधील रहिवाशांना दररोज रात्री पाकच्या हल्ल्याचा फटका बसणार नाही अशा सरकारी इमारती आणि शाळांमध्ये पाठवले जाते व सकाळी त्यांना पुन्हा गावात आणले जाते.