शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या प्रत्युत्तरात पाकमध्ये ८ जणांचा मृत्यू

By admin | Updated: August 26, 2014 10:29 IST

शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय सैन्याच्या छावण्या आणि सीमा रेषेवरील गावांवर हल्ला गोळीबार करणे पाकिस्तानलाच महागात पडले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ - शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय सैन्याच्या छावण्या आणि सीमा रेषेवरील गावांवर हल्ला व गोळीबार करणे पाकिस्तानलाच महागात पडले आहे. पाकच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात गेल्या दहा दिवसांत पाकिस्तान सैन्यातील जवानांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १२ जण जखमी झाले आहेत. 
जम्मू काश्मीरमधील भारत - पाक सीमा रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) आहे. पाकिस्तानी रेंजर्सच्या तुलनेत बीएसएफचे जवान अधिक सक्षम असून बीएसएफच्या जवानांकडील शस्त्रही पाकच्या तुलनेने चांगली आहेत. त्यामुळे बीएसएफने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचेच जास्त नुकसान होते अशी माहिती बीएसएफच्या एका अधिका-याने दिली आहे. गेल्यावर्षी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे १३ जवान शहीद झाले होते. यावर्षी आत्तापर्यंत भारताचा एक जवान शहीद झाला आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तर यंदा भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानमधील तीन जवान, तीन नागरिक आणि दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि बीएसएफचे महासंचालक डी..के. पाठक यांची नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत गृहमंत्र्यांनी बीएसएफला पाठिंबा देत पाकला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे करताना सीमा रेषेवरील गावांमध्ये राहणा-या नागरिकांची काळजी घ्यावी अशी सूचनाही देण्यात आली आहे. 'पाक सैन्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देत असलो तरी त्यांच्या गावांमधील नागरिकांना आम्ही लक्ष करत नाही' असेही अधिका-याने सांगितले. तर भारतीय हद्दीतील गावांमधील रहिवाशांना दररोज रात्री पाकच्या हल्ल्याचा फटका बसणार नाही अशा सरकारी इमारती आणि शाळांमध्ये पाठवले जाते व सकाळी त्यांना पुन्हा गावात आणले जाते.