शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

बालगुन्हेगारांची संख्या वाढतेय

By admin | Updated: May 7, 2016 01:34 IST

विविध सामाजिक कारणांमुळे कायदे मोडणाऱ्या मुलांची संख्या वाढत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच बाल सुधार गृहांमध्ये दरवर्षी अशा मुलांची गर्दी वाढत आहे.

नवी दिल्ली : विविध सामाजिक कारणांमुळे कायदे मोडणाऱ्या मुलांची संख्या वाढत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच बाल सुधार गृहांमध्ये दरवर्षी अशा मुलांची गर्दी वाढत आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकार प्रयत्नशील असून बाल न्याय कायदा २०१५ लागू करण्यात आला आहे.महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी शुक्रवारी राज्यसभेत ही माहिती दिली. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या. त्या म्हणाल्या, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार २०१२ साली गंभीर गुन्ह्यांसह विविध गुन्ह्यांत अटक झालेल्या मुलांची संख्या ३९८२२ एवढी होती. २०१३ मध्ये ती ४३,५०६ झाली. तर २०१४ साली हा आकडा ४८२३० वर पोहोचला.२०१२ मध्ये ९६७७, २०१३ ला ९५४९ व २०१४ ला ८७०० मुलांना निगराणी गृह व विशेष गृहांमध्ये पाठविण्यात आले. १५ जानेवारी २०१६ पासून बाल न्याय (बालकांची देखरेख आणि संरक्षण) कायदा २०१५ लागू करण्यात आला आहे. परंतु अद्याप राज्यांनी त्याची अंमलबजावणी करायची आहे. नव्या कायद्याच्या कलम ४१ अंतर्गत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मुलांसाठी असलेली गृहे व संस्थांना याचे पालन न केल्यास दंड ठोठावला जाईल. तसेच कलम ५३ नुसार या संस्थांमध्ये शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, मानसिक आरोग्याची काळजी आदी माध्यमाने मुलांच्या पुनर्वसनाची तरतूद करण्यात आली असल्याचेही गांधी यांनी सांगितले.त्यांनी सांगितले की, केंद्राद्वारे प्रायोजित सर्वंकष बाल संरक्षण योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१४ पासून वित्तीय मापदंडांमध्ये सुधारणा करण्यात आली. सुधारगृहांमधील मुलांच्या उदरनिर्वाह भत्त्यात मुलाप्रती दर महिन्याला ७५० रुपयांवरुन रु. २००० एवढी वाढ करण्यात आली.सुधारगृहांची पाहणीखा.दर्डा यांनी विचारलेल्या अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात मेनका गांधी यांनी सांगितले की, इ.स. २०१४-१५ मध्ये ओडिशातील ६, राजस्थान १४,पश्चिम बंगाल १३ आणि मध्य प्रदेशातील ८ बालगृह व संस्थांची पाहणी करण्यात आली. यादरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्या. बऱ्याच सुधारगृहांमध्ये सहज पोहोचणे शक्य होत नाही. तेथे मुलांची नियमित आरोग्य तपासणी होत नसून व्यावसायिक प्रशिक्षण, मनोरंजन सुविधा अत्यंत निम्न दर्जाच्या आहेत.