शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

नोटाबंदीमुळे पती-पत्नींमध्ये वाढली भांडणं

By admin | Updated: February 6, 2017 11:42 IST

नोटाबंदी निर्णयामुळे पती-पत्नीच्या नात्यात कटुता आली असून घरगुती हिंसाचारातही वाढ झाल्याचा दावा मध्य प्रदेशातील एका संस्थेने केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 6 -   नोटाबंदी निर्णयामुळे पती-पत्नीच्या नात्यात कटुता आली असून घरगुती हिंसाचारातही वाढ झाल्याचा दावा मध्य प्रदेशातील एका संस्थेने केला आहे. पती-पत्नींमधील भांडण सोडवण्यासाठी समुपदेशनाचे कार्य करणा-या संस्थांमध्ये घरगुती हिंसाचाराची प्रकरणं मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. 
 
नोटाबंदी निर्णयामुळे केवळ सर्वसामान्य आणि शेतकरीच हैराण झाले नसून, पती-पत्नीमधील वादही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, असा दावा ‘गौरवी-वन स्टॉप क्रायसिस सेंटर’ या मध्य प्रदेशातील संस्थेने केला आहे. ही संस्था पती-पत्नींमधील भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावते. या संस्थेच्या अध्यक्षा सारिका सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नोटाबंदी निर्णयानंतर मध्य प्रदेशात पती-पत्नीमधील भांडणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे'.
 
सारिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी निर्णयाची घोषणा झाल्यानंतर दाम्पत्यांमधील वादाची अशी अनेक प्रकरण संस्थेत दाखल करण्यात आली आहेत, ज्यात महिलांनी काटकसर करुन स्वतःकडे ठेवलेल्या 500, 1000 रुपयांच्या नोटा बदलून आणण्यासाठी आपल्या पतीकडे सोपवल्या, मात्र यानंतर पतीने ते पैसे पत्नीला परत केलेच नाहीत. यामुळे पती-पत्नीमध्ये तू-तू-मै-मै होऊ लागली आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला.
 
सारिका यांनी असेही सांगितले की, काही प्रकरणांमध्ये पत्नी वर्गाकडून 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा 30 डिसेंबरनंतर समोर आल्या. यामुळे त्या दाम्पत्यांमध्ये शाब्दिक खटके उडून मारहाणदेखील होऊ लागली. सध्या समुपदेशन केंद्रांमध्ये पती-पत्नींमध्ये समेट घडवून आणून भांडण संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गौरवी संस्थेच्या संचालिका शिवानी सैनी यांनी सांगितले की, नोटाबंदी पूर्वी संस्थेत 50 प्रकरणं येत होती. तर नोव्हेंबर 2016 ते जानेवारी 2017 पर्यंत भोपाळमधील गौरव संस्थेत घरगुती हिंसाचाराची जवळपास 200 प्रकरणं नोंदवण्यात आली. 
 
यातील सर्वाधिक वाद नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलन तुटवडा आणि यातून  झालेल्या मारहाणीची होती. सैनी यांनी असेही सांगितले की, घरगुती हिंसाचार पूर्वीही होता मात्र नोटाबंदीनंतर यात अधिक प्रमाणात वाढ झाली आहे.