शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गरीब, दलितांवरील अत्याचारात वाढ

By admin | Updated: May 28, 2017 04:20 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांना सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी हिंसाचारग्रस्त सहारनपूरमध्ये येण्यास जिल्हा प्रशासनाने मज्जाव केला आणि त्यामुळे सहारनपूरच्या

- शीलेश शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/सहारणपूर : काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांना सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी हिंसाचारग्रस्त सहारनपूरमध्ये येण्यास जिल्हा प्रशासनाने मज्जाव केला आणि त्यामुळे सहारनपूरच्या हद्दीपाशीच त्यांनी दंगलग्रस्त दलितांची भेट घेऊ न, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना सहारनपूरमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली.मात्र आपण पुन्हा सहारनपूरला जाणार असल्याचे खा. गांधी यांनी नंतर जाहीर केले. सहारनपूरच्या हद्दीवरील जाहजहांपूर चौकीपाशी दलित कुटुंबांची भेट घेतल्यानंतर, आज देशात गरीब आणि कमजोर घटकांना कोणतेच स्थान राहिलेले नाही. दलितांवर अत्याचार होत आहेत, त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. हे केवळ उत्तर प्रदेशात नव्हे, तर साऱ्या देशात होत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. सहारनपूरच्या हद्दीपाशी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व राहुल गांधी यांच्यात काहीशी वादावादीही झाली. त्या भागात १४४ कलम लागू केले असतानाही, तिथे त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. त्यांच्यासोबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व खा. राज बब्बर हेही होते. राज बब्बर म्हणाले की, उत्तर प्रदेशात दलितांवर होणारे अत्याचार सहन केले जाणार नाही. या प्रश्नावर काँग्रेस देशव्यापी आंदोलन उभारेल. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राहुल गांधी पुन्हा सहारनपूरला जाणार आहेत. दिल्लीत परत आल्यावर त्यांनी ट्विट केले असून, उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, त्यास राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका त्यात केली आहे. देशातील गरीब, दलित वर्ग घाबरलेला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. याआधी बसपाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनाही सहारनपूरमध्ये प्रवेशास बंदी घालण्यात आली होती.- सहारनपूरमध्ये ठाकुरांनी दलितांवर अत्याचार करूनही राज्य सरकारने कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेध करण्यासाठी काँग्रेस, सपा आणि बसपा एकत्र मिळून राज्यात आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.