शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

गरीब, दलितांवरील अत्याचारात वाढ

By admin | Updated: May 28, 2017 04:20 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांना सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी हिंसाचारग्रस्त सहारनपूरमध्ये येण्यास जिल्हा प्रशासनाने मज्जाव केला आणि त्यामुळे सहारनपूरच्या

- शीलेश शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/सहारणपूर : काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांना सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी हिंसाचारग्रस्त सहारनपूरमध्ये येण्यास जिल्हा प्रशासनाने मज्जाव केला आणि त्यामुळे सहारनपूरच्या हद्दीपाशीच त्यांनी दंगलग्रस्त दलितांची भेट घेऊ न, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना सहारनपूरमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली.मात्र आपण पुन्हा सहारनपूरला जाणार असल्याचे खा. गांधी यांनी नंतर जाहीर केले. सहारनपूरच्या हद्दीवरील जाहजहांपूर चौकीपाशी दलित कुटुंबांची भेट घेतल्यानंतर, आज देशात गरीब आणि कमजोर घटकांना कोणतेच स्थान राहिलेले नाही. दलितांवर अत्याचार होत आहेत, त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. हे केवळ उत्तर प्रदेशात नव्हे, तर साऱ्या देशात होत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. सहारनपूरच्या हद्दीपाशी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व राहुल गांधी यांच्यात काहीशी वादावादीही झाली. त्या भागात १४४ कलम लागू केले असतानाही, तिथे त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. त्यांच्यासोबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व खा. राज बब्बर हेही होते. राज बब्बर म्हणाले की, उत्तर प्रदेशात दलितांवर होणारे अत्याचार सहन केले जाणार नाही. या प्रश्नावर काँग्रेस देशव्यापी आंदोलन उभारेल. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राहुल गांधी पुन्हा सहारनपूरला जाणार आहेत. दिल्लीत परत आल्यावर त्यांनी ट्विट केले असून, उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, त्यास राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीका त्यात केली आहे. देशातील गरीब, दलित वर्ग घाबरलेला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. याआधी बसपाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनाही सहारनपूरमध्ये प्रवेशास बंदी घालण्यात आली होती.- सहारनपूरमध्ये ठाकुरांनी दलितांवर अत्याचार करूनही राज्य सरकारने कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेध करण्यासाठी काँग्रेस, सपा आणि बसपा एकत्र मिळून राज्यात आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.