शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार

By admin | Updated: June 17, 2017 23:14 IST

रेंद्र मोदी सरकारने येत्या पाच वर्षांत सात कलमी कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे लक्ष्य ठरवले आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास

वडोदरा : नरेंद्र मोदी सरकारने येत्या पाच वर्षांत सात कलमी कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे लक्ष्य ठरवले आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे दिली. देशाच्या वेगवेगळ््या राज्यांत शेतकऱ्यांत निर्माण झालेल्या अस्वस्थेच्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी ही माहिती दिली. गेल्या वर्षी मोदी यांनी या सात कलमी धोरणाला जाहीर केले होते. त्यात शेतकऱ्यांनापिकांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, उत्तम दर्जाची बियाणे आणि पीक काढल्यानंतर होणारे नुकसान टाळणे आदीचा समावेश होता. येथून ४० किलोमीटरवरील आणंद येथे शुक्रवारी जावडेकर यांच्या हस्ते मेकिंग आॅफ डेव्हलपड् इंडिया मेलाचे (मोदी फेस्ट) उद््घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. सात कलमांचा तपशील सांगताना जावडेकर म्हणाले की,‘‘पर ड्रॉप, मोअर क्रॉपद्वारे सिंचनावर मोठा भर असून त्यासाठी आर्थिक तरतूदही मोठी आहे. उत्तम दर्जाची बियाणे आणि प्रत्येक शेतजमिनीचा कस वाढवण्यासाठी पोषकघटक उपलब्ध करून देणे, गोदामांसाठी मोठी गुंतवणूक आणि कापणीनंतर पिकांची होणारी हानी टाळण्यासाठी शीतगृहांची साखळी निर्माण करणे तसेच अन्न प्रक्रियेद्वारे उत्पादनाची मूल्यवृद्धी करणे, राष्ट्रीय पातळीवर शेती बाजारपेठ तयार करणे, ५८५ स्टेशन्सवर ई प्लॅटफॉर्म तयार करणे, कुक्कुटपालन, मधमाशा पालन, मासेमारी आदी जोडव्यवसायाला प्रोत्साहन आणि परवडणाऱ्या किमतीत जोखीम कमी करणारी नवी विमा योजना सुरू करणे हे देखील या योजनेचे भाग आहेत.’’ निमकोटेड युरिया खताच्या छोट्या पिशव्या उपलब्ध झाल्यामुळे युरिया खताचा वापर कमी झाला असून त्यावरील वार्षिक अनुदानापोटीचे सात हजार कोटी वाचले आहेत, असेही जावडेकर म्हणाले.पूर्वी शेतीतील उत्पादन वाढवण्याची पद्धत टाळून त्याऐवजी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर आमचा भर आहे, असे जावडेकर म्हणाले. 2022 पर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे ठरवले आहे.