शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

बिहारच्या अस्थिरतेत वाढ

By admin | Updated: July 16, 2017 01:58 IST

भ्रष्टाचाराचा आरोप असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वीप्रसाद यादव यांच्या मागणीवरून बिहार सरकारमधील संयुक्त जनता दल व राष्ट्रीय जनता दल यांच्यातील तणाव

- एस. पी. सिन्हा। लोकमत न्यूज नेटवर्क

पाटणा : भ्रष्टाचाराचा आरोप असलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वीप्रसाद यादव यांच्या मागणीवरून बिहार सरकारमधील संयुक्त जनता दल व राष्ट्रीय जनता दल यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. यादव यांना राजीनाम्यासाठी चार दिवसांची मुदत शुक्रवारीच संपली असून, राज्य सरकारच्या एका कार्यक्रमाला त्यांनी शनिवारी दांडीच मारली.जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सरकारने पाटण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नितीश कुमार व तेजस्वीप्रसाद यादव प्रमुख पाहुणे होते. मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला वेळेवर पोहोचले. पण काहीही कारण न देता यादव तिथे गेलेच नाहीत. ते येणार हे गृहित धरून, तिथे टेबलावर त्यांच्या नावाची पट्टी (नेमप्लेट) ठेवली होती. पण ते न आल्याने त्यावर आधी कापड टाकण्यात आले आणि नंतर तर ती पट्टीच टेबलावरून काढूनच टाकण्यात आली.संयुक्त जनता दलाने दिलेली चार दिवसांची मुदत संपली तरी यादव यांनी राजीनामा दिलेला नाही आणि त्यांनी राजीनामा देण्याची गरजच नाही, असे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी जाहीरच केले आहे. त्यामुळे दोन पक्षांतील तणाव वाढला आहे. यादव यांना नितीश कुमार यांनी काढून टाकले, तर लालूप्रसाद यादव सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील आणि सरकार कोसळेल, असे बोलले जात आहे. अर्थात सरकार स्थिर असल्याचे लालूप्रसाद यांनी बोलून दाखवले आहे.काहींच्या मते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर तेजस्वीप्रसाद राजीनामा देऊ शकतील. त्यानंतरही राजद सरकारमध्ये राहील आणि त्याबदल्यात लालूप्रसाद तेजप्रताप याला उपमुख्यमंत्रीपद द्यावे, असा आग्रह धरतील, असा अंदाज आहे.सोनिया गांधींची मध्यस्थी : लालूप्रसाद यादव व नितीश कुमार यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी प्रयत्नशील असल्याचे कळते. त्यांनी शुक्रवारी दोन्ही नेत्यांशी फोनवरून बातचीत केली आणि लालूप्रसाद यांना काहीसे नमते घेण्यास सांगितले, असे कळते.