शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

दिल्लीत कृषी कर्जात वाढ; लाभार्थी घटले

By admin | Updated: April 6, 2016 22:16 IST

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना दिल्ली शहरांमध्ये मात्र शेतकऱ्यांची भरभराट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीदुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना दिल्ली आणि चंदीगडसारख्या शहरांमध्ये मात्र शेतकऱ्यांची भरभराट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.गोवा आणि देशाच्या अन्य भागात शेतकऱ्यांनी स्वस्त दराचे कर्ज उचलण्यात मोठी घट झाली आहे. याउलट राजधानी दिल्लीत मात्र शेतकऱ्यांच्या नावावरील कर्जात भरमसाट म्हणजे दुपटीपेक्षा जास्त वाढ झाल्याचे प्रकाशात आले आहे. २०१३-१४ मध्ये दिल्लीवासी शेतकऱ्यांनी ७७१९.२३ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०१४-१५ यावर्षात ते दुपटीवर म्हणजे १५,९१४.४३ कोटीपर्यंत वाढले. या वर्षातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या मात्र कमी होऊन १६,९७९ झाली. २०१३-१४ मध्ये शेतकऱ्यांची संख्या ६३,०९४ एवढी दाखविण्यात आली. याचा अर्थ कर्जाची रक्कम दुप्पट म्हणजे १०० टक्क्यांनी वाढली; मात्र प्रत्यक्षात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत ४०० टक्क्यांची घट झाली. अन्य क्षेत्रात व्याजदर १४ टक्के असताना कृषी कर्जाचा व्याजदर ४ ते ७ टक्के एवढाच आहे. शेतीच्या नावावर कर्ज उचलण्याचे हे कारणही त्यातून स्पष्ट होते. चंदीगडच्या शेतकऱ्यांनी २०१४-१५ या वर्षात २४१७.३९ कोटी रुपये एवढे सवलतीचे कर्ज घेतले. याआधीच्या वर्षातील कर्जाची रक्कम १७३० कोटी रुपये होती. तुुलनेत ते ४० टक्क्यांनी जास्त आहे. या शहरातील शेतकऱ्यांची संख्या मात्र जवळपास ३५० टक्क्यांनी कमी झाली आहे.१० हजार कोटींची घसरणतथापि हे सर्व शेतीवर अवलंबून असलेल्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत पूर्णपणे विसंगत आहे. महाराष्ट्रातील कर्ज वाटपात १०,००० कोटींची घसरण झाली आहे. २०१३-१४ या वर्षात राज्यात ७२,७४९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. परंतु २०१४-१५ मध्ये हा आकडा ६२,७२५ कोटींपर्यंत घसरला. आश्चर्याची बाब अशी की, याच काळात कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र पाच लाखांनी वाढली. २०१३-१४ मध्ये २४.७३ लाख शेतकऱ्यांनी कृषी कर्ज घेतले होते. ही संख्या २०१४-१५ मध्ये २९.३६ लाखांवर पोहोचली. गोव्यातही महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती झाली आहे.