शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

दिल्लीत कृषी कर्जात वाढ; लाभार्थी घटले

By admin | Updated: April 6, 2016 22:16 IST

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना दिल्ली शहरांमध्ये मात्र शेतकऱ्यांची भरभराट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीदुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना दिल्ली आणि चंदीगडसारख्या शहरांमध्ये मात्र शेतकऱ्यांची भरभराट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.गोवा आणि देशाच्या अन्य भागात शेतकऱ्यांनी स्वस्त दराचे कर्ज उचलण्यात मोठी घट झाली आहे. याउलट राजधानी दिल्लीत मात्र शेतकऱ्यांच्या नावावरील कर्जात भरमसाट म्हणजे दुपटीपेक्षा जास्त वाढ झाल्याचे प्रकाशात आले आहे. २०१३-१४ मध्ये दिल्लीवासी शेतकऱ्यांनी ७७१९.२३ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०१४-१५ यावर्षात ते दुपटीवर म्हणजे १५,९१४.४३ कोटीपर्यंत वाढले. या वर्षातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या मात्र कमी होऊन १६,९७९ झाली. २०१३-१४ मध्ये शेतकऱ्यांची संख्या ६३,०९४ एवढी दाखविण्यात आली. याचा अर्थ कर्जाची रक्कम दुप्पट म्हणजे १०० टक्क्यांनी वाढली; मात्र प्रत्यक्षात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत ४०० टक्क्यांची घट झाली. अन्य क्षेत्रात व्याजदर १४ टक्के असताना कृषी कर्जाचा व्याजदर ४ ते ७ टक्के एवढाच आहे. शेतीच्या नावावर कर्ज उचलण्याचे हे कारणही त्यातून स्पष्ट होते. चंदीगडच्या शेतकऱ्यांनी २०१४-१५ या वर्षात २४१७.३९ कोटी रुपये एवढे सवलतीचे कर्ज घेतले. याआधीच्या वर्षातील कर्जाची रक्कम १७३० कोटी रुपये होती. तुुलनेत ते ४० टक्क्यांनी जास्त आहे. या शहरातील शेतकऱ्यांची संख्या मात्र जवळपास ३५० टक्क्यांनी कमी झाली आहे.१० हजार कोटींची घसरणतथापि हे सर्व शेतीवर अवलंबून असलेल्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत पूर्णपणे विसंगत आहे. महाराष्ट्रातील कर्ज वाटपात १०,००० कोटींची घसरण झाली आहे. २०१३-१४ या वर्षात राज्यात ७२,७४९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. परंतु २०१४-१५ मध्ये हा आकडा ६२,७२५ कोटींपर्यंत घसरला. आश्चर्याची बाब अशी की, याच काळात कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र पाच लाखांनी वाढली. २०१३-१४ मध्ये २४.७३ लाख शेतकऱ्यांनी कृषी कर्ज घेतले होते. ही संख्या २०१४-१५ मध्ये २९.३६ लाखांवर पोहोचली. गोव्यातही महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती झाली आहे.