शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

दिल्लीत कृषी कर्जात वाढ; लाभार्थी घटले

By admin | Updated: April 6, 2016 22:16 IST

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना दिल्ली शहरांमध्ये मात्र शेतकऱ्यांची भरभराट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीदुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असताना दिल्ली आणि चंदीगडसारख्या शहरांमध्ये मात्र शेतकऱ्यांची भरभराट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.गोवा आणि देशाच्या अन्य भागात शेतकऱ्यांनी स्वस्त दराचे कर्ज उचलण्यात मोठी घट झाली आहे. याउलट राजधानी दिल्लीत मात्र शेतकऱ्यांच्या नावावरील कर्जात भरमसाट म्हणजे दुपटीपेक्षा जास्त वाढ झाल्याचे प्रकाशात आले आहे. २०१३-१४ मध्ये दिल्लीवासी शेतकऱ्यांनी ७७१९.२३ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०१४-१५ यावर्षात ते दुपटीवर म्हणजे १५,९१४.४३ कोटीपर्यंत वाढले. या वर्षातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या मात्र कमी होऊन १६,९७९ झाली. २०१३-१४ मध्ये शेतकऱ्यांची संख्या ६३,०९४ एवढी दाखविण्यात आली. याचा अर्थ कर्जाची रक्कम दुप्पट म्हणजे १०० टक्क्यांनी वाढली; मात्र प्रत्यक्षात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत ४०० टक्क्यांची घट झाली. अन्य क्षेत्रात व्याजदर १४ टक्के असताना कृषी कर्जाचा व्याजदर ४ ते ७ टक्के एवढाच आहे. शेतीच्या नावावर कर्ज उचलण्याचे हे कारणही त्यातून स्पष्ट होते. चंदीगडच्या शेतकऱ्यांनी २०१४-१५ या वर्षात २४१७.३९ कोटी रुपये एवढे सवलतीचे कर्ज घेतले. याआधीच्या वर्षातील कर्जाची रक्कम १७३० कोटी रुपये होती. तुुलनेत ते ४० टक्क्यांनी जास्त आहे. या शहरातील शेतकऱ्यांची संख्या मात्र जवळपास ३५० टक्क्यांनी कमी झाली आहे.१० हजार कोटींची घसरणतथापि हे सर्व शेतीवर अवलंबून असलेल्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत पूर्णपणे विसंगत आहे. महाराष्ट्रातील कर्ज वाटपात १०,००० कोटींची घसरण झाली आहे. २०१३-१४ या वर्षात राज्यात ७२,७४९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. परंतु २०१४-१५ मध्ये हा आकडा ६२,७२५ कोटींपर्यंत घसरला. आश्चर्याची बाब अशी की, याच काळात कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र पाच लाखांनी वाढली. २०१३-१४ मध्ये २४.७३ लाख शेतकऱ्यांनी कृषी कर्ज घेतले होते. ही संख्या २०१४-१५ मध्ये २९.३६ लाखांवर पोहोचली. गोव्यातही महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती झाली आहे.