शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

अर्थ संकल्प प्रतिक्रीया सुधारीत

By admin | Updated: March 2, 2016 00:04 IST

भावी प्रगतीसाठी चांगले

भावी प्रगतीसाठी चांगले
जागतिक मंदीची चाहूल, देशातील औद्योगिक उत्पादनात झालेली घट आणि मान्सूनने दिलेला दगा लक्षात घेता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प चांगलाच म्हणावा लागेल. अतिश्रीमंतांना द्यावा लागणारा आयकर आणि तंबाखूवर कर वाढविणे याबद्दल तक्रार करता येणार नाही. छोटे करदाते व व्यावसायिकांना दिलेल्या सवलती योग्य आहेत. अर्थसंकल्प राबविणार्‍या यंत्रणेला जर भ्रष्टाचाराने ग्रासले नाही, तर हा अर्थसंकल्प भावी प्रगतीसाठी अधिक चांगले वातावरण निर्माण करू शकेल, अशी आशा वाटते.
- नंदिनी चपळगावकर (उद्योजिका)

ना फायदा, ना तोटा
मोठमोठ्या उद्योगांवर या अर्थसंकल्पाचा काय परिणाम होईल, ते माहीत नाही, पण एक सर्वसाधारण माणूस म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहिल्यास असे वाटते की, यामुळे सामान्य माणसांचा ना फायदा होणार आहे, ना कोणता तोटा. सामान्य जनजीवनावर कोणताही मोठा प्रभाव पडेल असे वाटत नाही. हे सगळे कागदोपत्री वाटते. ग्रामसडक योजनेसारख्या पायाभूत सुविधांवर तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्याचे समाधान वाटते.
- स्वाती जोशी

बँकिंग क्षेत्रातील तरतूद समाधानकारक
एक बँक कर्मचारी म्हणून हा अर्थसंकल्प सर्वसाधारण वाटतो. पाच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणार्‍यांना आयकरात मिळालेली सूट फायदेशीर ठरेल. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, ग्रामसडक योजना यामुळे ग्रामीण भागाचा विकास होईल असे वाटते. नोकरदार व्यक्तींची एटीसीची मर्यादा वाढावी, अशी अपेक्षा होती. राष्ट्रीयीकृत बँक ांसाठी केलेली २५,००० कोटींची तरतूद समाधानकारक वाटते.
- अंजली कुलकर्णी (बँकर)