नवी दिल्ली : हज यात्रेकरिता जाणा:या यात्रेकरूंच्या सोयी व सवलतींमध्ये मोठय़ा प्रमाणात सुधारणा करण्याचे, तसेच भारतीय यात्रेकरूंच्या संख्येत केलेल्या 2क् टक्के कपातीला परत घेण्याविषयी सौदी अरबला विनंती करण्याचे आश्वासन सरकारने आज येथे दिले.
या यात्रेच्या व्यवस्थेमध्ये असलेल्या उणिवांचा स्वीकार करताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी, एअर इंडिया या विमान कंपनीवरही टीकास्त्र सोडले. ही कंपनी श्रीनगरहून हजला जाणा:या यात्रेकरूंकडून 1.54 लाख रुपये घेते; मात्र त्याचवेळी अन्य विमानतळांवरून जाणा:या यात्रेकरूंकडून 62 हजार रुपये घेतले जातात असे त्यांनी पुढे नमूद केले.
अखिल भारतीय वार्षिक हज संमेलनात बोलताना स्वराज यांनी, या यात्रेकरूंसाठी मुक्कामाचे ठिकाण हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे म्हटले. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे मत मांडून त्यांनी मक्का व जवळपासच्या भागात भारतीय यात्रेकरूंना अरब सरकार यासंदर्भात पावले टाकू शकते, असे मत नोंदवले.
सौदी सरकारच्या सहकार्याने या भागातील परिसराचा विकास केला जाण्याची गरज अधोरेखित करताना स्वराज यांनी, या जागेचा वापर तीन महिने हज यात्रेकरूंच्या निवासाकरिता करणो व उरलेल्या काळात अन्य भाविक तेथे राहू शकतात असा प्रस्तावही मांडला. स्वातंत्र्यापूर्वी मक्केत असलेल्या भारतीय मालमत्तेचे काय झाले याचाही छडा सरकार लावणार असल्याचे त्यांनी घोषित केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4तिरुवनंतपूरम : राज्यात पंतप्रधानांचे कार्यालय सुरू होण्याबाबत केरळ सरकारला कुठलीही सूचना मिळाली नसल्याचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांनी स्पष्ट केले आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी राज्य सरकारला याबाबत काही विचारणा केली होती काय? यावर नाही, असे उत्तर दिले.