शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सुधारित-आयएएस अधिकारी मृत्यूप्रकरण

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

आयएएस रवी मृत्यूप्रकरण

आयएएस रवी मृत्यूप्रकरण
मृत्यूपूर्वी बॅचमेट महिलेला केले होते ४४ फोन
आत्महत्येची दिली होती धमकी
बेंगळुरु : कर्नाटकातील आयएएस अधिकार डी.के. रवी यांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या तुकडीतील सहकारी महिलेला एका तासात ४४ वेळा फोन केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली असतानाच सदर महिलेनेही रवी आपल्याशी लग्न करू इच्छित होते आणि लग्न न केल्यास जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी त्यांनी दिली होती, असा खुलासा केल्याने आता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
दरम्यान या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी दबाव वाढत असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी शुक्रवारी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन त्यांच्या ताज्या घडामोडींची माहिती दिली. रवी हे एक अत्यंत प्रामाणिक अधिकारी होते. त्यामुळे त्यांच्या रहस्यमय मृत्यूने राज्यभरात जनआक्रोष पसरला होता. लोकसभेतही त्यांच्या मृत्यूचे पडसाद उमटले होते.
रवी यांनी ज्या महिलेला मृत्यूपूर्वी एका तासात ४४ फोन केले होते तिलाच काही एसएमएसही पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. आयएएस अधिकारी असलेली ही महिलाही विवाहित असून तिला एक अपत्य आहे. तिचे पती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. २००९ साली एकाच तुकडीतील असल्याने रवी आणि सदर महिलेची लग्नापूर्वी मैत्री होती.
रवी यांची माझ्याशी लग्न करण्याची इच्छा होती. त्यांनी सोमवारी अनेकदा मला फोन केले. मी लग्नास तयार झाली नाहीतर जीवाचे काही बरेवाईट करून घेण्याची धमकीही त्यांनी दिली होती. परंतु मी त्यांचा हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला होता, असा दावा या महिला अधिकाऱ्याने केला असल्याचे समजते.
मंड्या जिल्हा पंचायतीच्या सीईओ असलेल्या या महिलेने राज्याचे मुख्य सचिव कौशिक मुखर्जी यांना रवीचे सर्व एसएमएस, कॉल्स आणि ई-मेलबाबत माहिती दिली आहे. आपण कुठल्याही चौकशीस तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.
राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणाची चौकशी सीआयडीच्या सुपूर्द करण्यात आली असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. सरकारच्या भूमिकेत बदल झाला नसल्याचे गृहमंत्री के.जे. जॉर्ज यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्पष्ट केले होते. दुसरीकडे संयुक्त जनता दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस सरकारवर रवी यांच्या खासगी जीवनातील मुद्दा उपस्थित करून एका महिला आयएएस अधिकाऱ्यास यात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. सत्य दडवून ठेवण्यासाठी असे केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वर्गमित्रांची निष्पक्ष चौकशीची मागणी
दरम्यान डी.के. रवी यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी आयएएस अधिकाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी केली. यासंदर्भात रवी यांच्या वर्गमित्रांकडून आम्हाला एक निवेदन मिळाले असल्याचे सेंट्रल आयएएस असोसिएशनचे सचिव आणि ज्येष्ठ आयएएस अधिकारी संजय आर. भुसरेड्डी यांनी नवी दिल्लीत सांगितले. (वृत्तसंस्था)