शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांवर छापे

By admin | Updated: September 27, 2015 05:56 IST

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांच्या घरासह ११ ठिकाणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी छापे टाकले.

सिमला/ नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांच्या घरासह ११ ठिकाणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी छापे टाकले. लेकीच्या लग्नासाठी वऱ्हाडासोबत मुख्यमंत्री घराबाहेर पडल्यावर अवघ्या काही मिनिटांतच घरी दाखल झालेल्या सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. परिणामी, मुलीच्या लग्नासारख्या मंगल मुहूर्तावर सीबीआयने केलेली ही कारवाई अमानवीय आणि तद्दन सूडभावनेतून केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हिमाचलमधील भाजपा नेत्यांनी वीरभद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर हिमाचलचे सर्व ११ मंत्री मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. ८१ वर्षीय सिंग सकाळी ७.३० वाजता आपल्या सरकारी निवासस्थानातून रवाना होताच त्यांच्या दिल्ली, सिमला आणि अन्य ठिकाणच्या घरांवर छाप्यांचे सत्र सुरू झाले. सीबीआयने सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा ६.१ कोटी रुपये अधिक कमाई केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. संपुआच्या शासन काळात केंद्रीय पोलाद मंत्री असताना ही बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. वीरभद्र यांच्या पत्नी प्रतिभा सिंग, मुलगा विक्रमादित्य सिंग, मुलगी अपराजिता सिंग आणि एलआयसी एजंट आनंद चौहान यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.--------सिंग आणि त्यांचे कुटुंबीय लग्नासाठी रवाना झाल्यावर काही मिनिटांतच तपास संस्थेचे १८ सदस्यीय पथक पाच वाहनांमधून सिंग यांच्या निवासस्थानी डेरेदाखल झाले. मुख्यमंत्री कुटुंबासमवेत लग्न आटोपून ११ वाजता घरी परतले; परंतु त्यावेळी घराबाहेर जमलेल्या पत्रकारांशी ते बोलले नाहीत.-------सूडभावनेतून ही कारवाई करण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिरस्काराच्या राजकारणाचा हा एक भाग आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्र्यांवर घालण्यात आलेले छापे म्हणजे काँग्रेस नेत्यांविरुद्ध राजकीय सूड उगवण्याचा डाव असल्याचे आझाद यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. वधू-वर पक्षाचे कुटुंबीय आणि पाहुणे लग्नासाठी मंदिरात जात असताना छापे टाकणाऱ्या मोदी सरकारने राजकीय वैमनस्यापोटी भारतीय संस्कृती आणि परंपरेलासुद्धा सोडचिठ्ठी दिल्याची टीका करताना आझाद म्हणाले, की मुलीच्या लग्नात विघ्न आणण्याचा हा प्रकार अत्यंत अमानवीय आहे. क्रौर्य आणि सूडभावना ही पंतप्रधानांची शैली आहे.----------हिमाचल प्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने शुक्रवारी संयुक्त वक्तव्य जारी करून केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारवर राज्यातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी दबावाचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता.-----सूडभावनेने आपल्यावर ही कारवाई केली जात आहे. यापूर्वीदेखील अशाप्रकरची कारवाई दोन वेळा झाली होती, मात्र त्यावेळी आपण निर्दोष सुटलो होतो. आताही काहीसुद्धा होणार नाही, हा आपला विश्वास आहे. -वीरभद्र सिंग, मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेश