शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

फुटकळ कारणांवरून दलितांवर होणारे अत्याचार त्वरित रोखावेत : रामदास आठवले

By admin | Updated: May 17, 2017 20:40 IST

उत्तरप्रदेशातील सहारणपूर येथे दलित व दलितेतर समाजात पसरलेला तणाव, हरयाणात रोहतक येथे दलित महिलेवरील बलात्कार

सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 17 : उत्तरप्रदेशातील सहारणपूर येथे दलित व दलितेतर समाजात पसरलेला तणाव, हरयाणात रोहतक येथे दलित महिलेवरील बलात्कार, महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा गावात अलीकडेच घडलेल्या काही अप्रिय घटना यामुळे दलित समाज व अन्य समाजात दुर्देवाने तणाव पसरला आहे. कोणतेही गाव सर्वांचे असते. दलितांसह विशिष्ठ समुदायाच्या मिरवणुका तिथे रोखणे अन्यायकारक आहे. अशा घटनांमधून विव्देष पसरतो. तो त्वरित दूर व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांशी मी बोललो असून मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी व राज्यांच्या गृहमंत्र्याशीही मी स्वत: बोलणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शास्त्री भवनात पत्रपरिषदेत केले.देशातल्या प्रत्येक राज्यात ज्या जिल्ह्यांमधे दलितांवर अत्याचाराचे प्रयोग वारंवार मोठया संख्येने होतात, अशा जिल्ह्यात तणावांच्या बंदोबस्तासाठी तसेच त्वरीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांबरोबरच अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख हे नवे पद निर्माण करावे, म्हणजे दलितांना सुरक्षितपणे जगण्यासाठी आश्वस्थ तरी होता येईल. असे नमूद करीत आठवले म्हणाले, दलित व महिला यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांमधे सध्या वाढ झाली आहे. समाजस्वास्थ्य व देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिने ही बाब चांगली नाही. हरयाणात ज्या महिलेवर बलात्कार झाला ती मूळ पानिपतची रहाणारी असून रोजगारासाठी रोहतक येथे जाते. बलात्कारासारखे अत्याचार जर राजरोसपणे होत असतील तर सामान्य व गरीब जनतेने पोटासाठी काम कुठे आणि कसे करावे, असा प्रश्न निर्माण होतो. देशात बलात्कारासारख्या गुन्ह्यांबाबत निर्भया प्रकरणानंतर अत्यंत कडक कायदा संसदेने मंजूर केला. त्यानंतरही असे प्रकार बेधडक घडत असतील तर परिस्थिती चिंता करण्यासारखी आहे, हे मान्य करावे लागेल. सहारणपुरात अलीकडेच आंबेडकर जयंती आणि राणाप्रताप जयंतीच्या मिरवणुका रोखण्याचा दुर्देवी प्रकार घडला. तेव्हापासून दोन समुदायांमधे तिथे प्रचंड तणाव आहे. तो दूर झाला नाही तर त्यात त्वरेने लक्ष घाला, अशी विनंती मी मुख्यमंत्री योगींनाच करणार आहे.आठवलेंवर पत्रपरिषदेत अनेक प्रश्नांचा भडिमार झाला. देशात अल्पसंख्य आणि दलित अत्याचाराच्या घटनांमधे खरोखर वाढ झाली असेल, तर तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारी सोहळे आयोजित करण्यात कितपत औचित्य आहे? मुख्यमंत्रिपदी योगी विराजमान झाल्यापासून उत्तरप्रदेशात अल्पसंख्य भेदरलेले आहेत व दलित अत्याचाराच्या घटनांमधे वाढ झाली, हा आरोप खरा आहे काय? असे थेट प्रश्न विचारता आठवले म्हणाले, सहारणपूर तणावाबद्दल योगींना जबाबदार धरणे अयोग्य आहे. दलित अत्याचाराच्या गुन्ह्यांमधे उत्तरप्रदेश देशात सतत पहिल्या क्रमांकावर आहे. अखिलेश सरकार सत्तेवर असतांनाही हीच स्थिती होती. या यादीत बिहार दुसऱ्या, राजस्थान तिसऱ्या आणि महाराष्ट्र ८ व्या क्रमांकावर आहे. अत्याचारांचे प्रमाण सर्वत्र खाली यावे, हीच माझ्या पक्षाची