शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

फुटकळ कारणांवरून दलितांवर होणारे अत्याचार त्वरित रोखावेत : रामदास आठवले

By admin | Updated: May 17, 2017 20:40 IST

उत्तरप्रदेशातील सहारणपूर येथे दलित व दलितेतर समाजात पसरलेला तणाव, हरयाणात रोहतक येथे दलित महिलेवरील बलात्कार

सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 17 : उत्तरप्रदेशातील सहारणपूर येथे दलित व दलितेतर समाजात पसरलेला तणाव, हरयाणात रोहतक येथे दलित महिलेवरील बलात्कार, महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा गावात अलीकडेच घडलेल्या काही अप्रिय घटना यामुळे दलित समाज व अन्य समाजात दुर्देवाने तणाव पसरला आहे. कोणतेही गाव सर्वांचे असते. दलितांसह विशिष्ठ समुदायाच्या मिरवणुका तिथे रोखणे अन्यायकारक आहे. अशा घटनांमधून विव्देष पसरतो. तो त्वरित दूर व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांशी मी बोललो असून मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी व राज्यांच्या गृहमंत्र्याशीही मी स्वत: बोलणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शास्त्री भवनात पत्रपरिषदेत केले.देशातल्या प्रत्येक राज्यात ज्या जिल्ह्यांमधे दलितांवर अत्याचाराचे प्रयोग वारंवार मोठया संख्येने होतात, अशा जिल्ह्यात तणावांच्या बंदोबस्तासाठी तसेच त्वरीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांबरोबरच अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख हे नवे पद निर्माण करावे, म्हणजे दलितांना सुरक्षितपणे जगण्यासाठी आश्वस्थ तरी होता येईल. असे नमूद करीत आठवले म्हणाले, दलित व महिला यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांमधे सध्या वाढ झाली आहे. समाजस्वास्थ्य व देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिने ही बाब चांगली नाही. हरयाणात ज्या महिलेवर बलात्कार झाला ती मूळ पानिपतची रहाणारी असून रोजगारासाठी रोहतक येथे जाते. बलात्कारासारखे अत्याचार जर राजरोसपणे होत असतील तर सामान्य व गरीब जनतेने पोटासाठी काम कुठे आणि कसे करावे, असा प्रश्न निर्माण होतो. देशात बलात्कारासारख्या गुन्ह्यांबाबत निर्भया प्रकरणानंतर अत्यंत कडक कायदा संसदेने मंजूर केला. त्यानंतरही असे प्रकार बेधडक घडत असतील तर परिस्थिती चिंता करण्यासारखी आहे, हे मान्य करावे लागेल. सहारणपुरात अलीकडेच आंबेडकर जयंती आणि राणाप्रताप जयंतीच्या मिरवणुका रोखण्याचा दुर्देवी प्रकार घडला. तेव्हापासून दोन समुदायांमधे तिथे प्रचंड तणाव आहे. तो दूर झाला नाही तर त्यात त्वरेने लक्ष घाला, अशी विनंती मी मुख्यमंत्री योगींनाच करणार आहे.आठवलेंवर पत्रपरिषदेत अनेक प्रश्नांचा भडिमार झाला. देशात अल्पसंख्य आणि दलित अत्याचाराच्या घटनांमधे खरोखर वाढ झाली असेल, तर तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारी सोहळे आयोजित करण्यात कितपत औचित्य आहे? मुख्यमंत्रिपदी योगी विराजमान झाल्यापासून उत्तरप्रदेशात अल्पसंख्य भेदरलेले आहेत व दलित अत्याचाराच्या घटनांमधे वाढ झाली, हा आरोप खरा आहे काय? असे थेट प्रश्न विचारता आठवले म्हणाले, सहारणपूर तणावाबद्दल योगींना जबाबदार धरणे अयोग्य आहे. दलित अत्याचाराच्या गुन्ह्यांमधे उत्तरप्रदेश देशात सतत पहिल्या क्रमांकावर आहे. अखिलेश सरकार सत्तेवर असतांनाही हीच स्थिती होती. या यादीत बिहार दुसऱ्या, राजस्थान तिसऱ्या आणि महाराष्ट्र ८ व्या क्रमांकावर आहे. अत्याचारांचे प्रमाण सर्वत्र खाली यावे, हीच माझ्या पक्षाची